Mankhurd Bus Accident: मानखुर्द रेल्वे स्थानक पुलावर सोमवारी क्रमांक ५०१ बसचा भीषण अपघात झाल्यानंतर सकाळी ८.३० वाजल्यापासून जखमी व मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकांना संपर्क केला जात होता. परंतु, सार्वजनिक व खासगी रुग्णवाहिकांचा प्रतिसाद नाहीच मिळाला अशी माहिती समोर आली आहे.
मुंबई शहराची एकूण लोकसंख्या आणि विस्तार पाहता १०८सह इतर रुग्णवाहिकांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे, तरीही ही सुविधा आम्हाला उपलब्ध का झाली नाही, असा संतापजनक प्रश्न जखमींसह त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये एकूण १०८ रुग्णवाहिका आहेत. मानखुर्द रेल्वेस्थानकाबाहेर, तसेच शताब्दी रुग्णालयाच्या बाहेरही या रुग्णवाहिका उभ्या असतात. त्यादेखील या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या रुग्णांसाठी धावून आल्या नाहीत. ‘पहिला कॉल ८.३० वाजता आल्यानंतर तो लगेच रद्द केला. पुन्हा कॉल आला तेव्हा आम्ही रुग्णवाहिका पाठवली,’ अशी माहिती १०८ रुग्णवाहिकेचे मुंबई शहरातील केंद्रीय समन्वयक डॉ. आशुतोष यांनी दिली. वाहतूककोंडीमुळे उशीर झाल्याची शक्यताही वर्तवण्यात आली. नेमके कारण काय होते, याची चाचपणी करण्यात येईल, असेही समन्वयकांनी ‘मटा’ला सांगितले. मदत मागण्यासाठी फोन केला असता, तो रद्द कसा करण्यात येईल, याचे कोणतेही समाधानकारक उत्तर त्यांना देता आलेले नाही.
Mumbai BEST Bus Accident: ‘खिशात फक्त २०० रुपये, उपचार कसे करू?’ बेस्ट अपघातानंतर जखमी हतबल; बस व्हिडीओ गेमसारख्या वेगात चालवल्याचा दावा
या अपघातामध्ये जखमी झालेली अंकिता जाधव हिच्या पालकांसह रुक्मिणी घोरपडे, लता वाघेला यांच्या कुटुंबीयांनीही हा प्रकार अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगितले. ‘रुग्णवाहिका आली नाही. पोलिसांकडे आर्जव केल्यानंतर त्यांनी त्यांच्या वाहनातून रुग्णालयामध्ये आणले. सार्वजनिक रुग्णवाहिकांची सुविधा २४ तास उपलब्ध असते. आठ जण एकाच ठिकाणी जखमी अवस्थेमध्ये पडलेले असताना मदत त्वरित का मिळाली नाही,’ असा व्यथित प्रश्न उपस्थित केला. खासगी रुग्णवाहिकांनी येथे येण्यासाठी सहा ते सात हजार रुपये मागितले.
रिक्षाला वाचवायला गेलो…
समोर अचानक रिक्षा आल्याने त्या रिक्षामध्ये असलेल्या प्रवाशांचा अपघात होऊ नये, यासाठी त्यांना वाचवायला गेलो, मात्र बस पुढे जाऊन आपटली. त्यानंतर काय झाले ते आठवत नाही, असे राजावाडी रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार घेत असलेला बसचालक बनवारीलाल शर्मा (४९) यांनी सांगितले. बसवाहक वैभव सुखदेव वाघमारे (४१) यांच्या कपाळाला जखम झाली असून याविषयी काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. गोवंडी येथे वैद्यकीय उपचार घेत असलेले शंकर साकेत यांना काही वैद्यकीय चाचण्यांसाठी लो. टिळक रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते.
Mumbai BEST Bus Accident: भरधाव ‘बेस्ट’ थेट दुभाजकावर धडकली, ६५ वर्षीय पादचाऱ्याचा जागीच अंत; सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात
बेस्टचा सुरक्षित प्रवास वाऱ्यावर
मानखुर्द येथे सोमवारी झालेल्या बेस्ट बसच्या अपघातानंतर बेस्ट उपक्रम आणि भाडेतत्त्वावर बस पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांवर मुंबई महापालिका सभागृहात नगरसेवकांकडून रोष व्यक्त करण्यात आला. पूर्वीचा बेस्टचा सुरक्षित प्रवास आता वाऱ्यावर असल्याची टीका सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.
