Nashik Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
वैष्णवी हिचं लग्न दुसऱ्यासोबत ठरल्यानं प्रियकर साहिल आवारे याने वैष्णवी हिचा खून केला असल्याची तक्रार इंदिरानगर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार यांच्या बहिणीची आणि मयत वैष्णवी हिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. याचदरम्यान तक्रारदार यांची वैष्णवी हिच्याशी चांगली ओळख झाली होती. त्यानंतर वैष्णवी हिच्या मैत्रिणीने तक्रारदार यांच्या बहिणीला, ‘वैष्णवी ही चांगली मुलगी असून, तिला आई वडील नाहीत. गावी आजी आजोबा आहेत. ती तक्रारदार यांच्यासोबत चांगला संसार करू शकते’, असं सांगितलं.
Matheran Hill Railway: ‘माथेरानची राणी’ हायड्रोजनच्या बळावर धावण्याची शक्यता; ऐतिहासिक मिनी ट्रेनच्या नव्या प्रवासाची तयारी
त्यानंतर वैष्णवी आणि तक्रारदार यांच्या लग्नाची बोलणी सुरू होती. त्यावेळी वैष्णवी हिने ‘आपले याआधी साहिल लावारे (रा.उमरखेड, जि.यवतमाळ) याच्यासोबत अफेअर होते. ते दोघेही लिव्ह इनमध्ये राहत’, असं सांगितलं. त्यानंतर तक्रारदार यांचा वैष्णवी हिच्यावर आणखी विश्वास दृढ झाला आणि त्यांच्या दोघांनी लग्न करण्याचं ठरविलं. मात्र त्यानंतर ही बाब साहिल याला समजली आणि साहिल याच्याकडून वैष्णवी हिला फोन करून त्रास देण्यास सुरुवात झाली. ही बाब देखील वैष्णवी हिने तक्रारदार यांना कळवली होती.
‘वैशुला आज संपवले’
त्यानंतर काल शुक्रवारी रोजी 9 वाजता साहिलने तक्रारदार यांना फोन करून, ‘वैष्णवी हिला समजावून सांग, आणि माझ्याकडे पाठवून दे’, असं सांगितलं होतं. त्यांनंतर तक्रारदार यांनी वैष्णवी हिला त्रास न देण्यास सांगितलं. मात्र, साहिल याने वैष्णवी हिला त्रास देणं सुरूच ठेवलं. वैष्णवी हिने तक्रारदार यांना फोन केला आणि ‘साहिल येथे आला आहे’, असं सांगितलं. याचवेळी साहिल आणि वैष्णवीचा फोन सुरु होता. तब्बल 22 मिनिटे हा फोन सुरूच होता. संपूर्ण घडत असलेली घटना ही तक्रारदार फोनवर ऐकत होते.
Dhule Accident : देवदर्शनाहून येताना चालकाचं नियंत्रण सुटलं, कार दुभाजक तोडून ट्रकला धडकली; भीषण अपघातात दोघांचा करुन अंत
यावेळी सुरू असलेल्या फोनवर साहिल आणि वैष्णवी हिचे जोरदार भांडण सुरू असल्याचं सांगण्यात आलं आणि अखेर ‘वैशुला आज संपवले’, असा आवाज आला आणि फोन कट झाला’ असल्याचं तक्रारदार यांनी सांगितलं. त्यांनंतर तक्रादर वैष्णवी राहत असलेल्या इंदिरानगर येथील वनसंपदा कॉलनी येथे पोहोचले असता वैष्णवी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि आजूबाजूला मोठी गर्दी देखील झाली होती, असं तक्रारदार यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे.
Accident News: पुण्याकडे निघालेल्या दोन तरुणांचा वेगाने केला घात; भीषण अपघातात जागीच मृत्यू, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
या घटनेला काही तास ओलांडत नाही तोच साहिल याचा इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह हा आढळून आला. या संपूर्ण प्रकाराचा आता इंदिरानगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
