• Mon. Jun 29th, 2026
    Farmers Death: अवघ्या पाच महिन्यांत 312 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; विदर्भातील आकड्यांनी वाढविली चिंता, काय कारण?

    Vidarbha Farmer Death Case: पश्चिम विदर्भात मागील पाच महिन्यांत ३१२ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

    विदर्भ शेतकरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, वाशीम: नापिकीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या पश्चिम विदर्भात मागील पाच महिन्यांत ३१२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. २००१पासूनचा विचार करता हा आकडा २२ हजार ४९०वर गेला आहे.

    अमरावती विभागात जानेवारी मागील २६ वर्षांपासून शेतकरी आत्महत्या ंची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात ५,६२३, अकोला …३५१, यवतमाळ ६,६२५, बुलढाणा ४,६९० तर वाशीम जिल्ह्यात २२१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. चालू वर्षात पाच महिन्यांत यवतमाळ जिल्ह्यात १०५, अमरावती ६२, अकोला ५९, वाशीम ४६ तर बुलढाणा जिल्ह्यात ४० शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे.

    Maharashtra TimesKetan Agarwal : पूर्ण चौकशीविना लग्न लावू नका, केतनच्या आजोबांकडून भीती व्यक्त; सियाच्या विवाहाची घाई का करताय? गोयलांना दोन ऑप्शन दिलेले
    शेतकऱ्याचे जीवनमान उंचावे या दृष्टीने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन स्थापन करण्यात आले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची आखण्यात आली. जलसंधारणाच्या कामांना अग्रक्रमही देण्यात आला. शासनाने कर्जमाफी केली तरीही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

    शेतकरी आत्महत्येचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या आधारावर भाव द्यावा, बियाणे आणि खतांच्या वाढत्या दरांवर अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
    Maharashtra TimesMumbai Rain Ritu Tawde: अर्रर्र…! महापौर रितू तावडेंकडून नालेसफाईचं कौतुक; मागे BMCचा अधिकारीच मॅनहोलमध्ये पडला
    शेतकरी विधवांसाठी हवे स्वतंत्र महामंडळ
    अमरावती विभागात शेतकरी आत्महत्यांमुळे २२,४९० कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या विधवांवर कुटुंबाचा भार आला. या शेतकरी विधवांसाठी राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांच्या उपजीविकेसाठी साधने उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

    Maharashtra TimesPune News: पुण्यात दोन लेकरांसह घरात आढळली आईची बॉडी; नातेवाईकाने दिलेल्या माहितीतून घटनेचा उलगडा
    अडीच दशकांपासून मदत एक लाखच
    शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सरकारकडून मदत म्हणून एक लाख रुपये दिले जातात. या निर्णयात इतक्या वर्षांत एक रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही. या मदतीसाठी शेतकऱ्यांना सरकारी निकषात पात्र ठरावे लागते. चालू वर्षातील ३१२पैकी ५० प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरले आहे. ५० अपात्र तर २१२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा