• Sat. Aug 15th, 2026

Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi: राजकारणासाठी कोणत्याही स्तराला जाणे योग्य नाही. अशा वक्तव्यांना जनता योग्य उत्तर देईल, असेही बावनकुळे म्हणाले.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परराष्ट्र धोरणावरील टीकेवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी यांनी केवळ टीका करण्याचा ‘धंदा’ उचलला असून, व्यंग किंवा टीका करून कोणी मोठे होत नाही. अशा प्रकारे टीका करणारे लोक जास्त काळ टिकत नाहीत, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. देशाच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा योग्य भूमिका घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बावनकुळे शुक्रवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राजकीय टीका करताना संस्कार आणि मर्यादा पाळल्या पाहिजेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे देशाच्या संस्कृतीची बदनामी होत असल्याचा आरोप करत, त्यांनी या वक्तव्याबद्दल देशाची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

Maharashtra TimesNanded Santosh Kendre : नांदेडमध्ये पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचा जीव वाचवणारे धडाकेबाज PI संतोष केंद्रे कोण? A टू Z माहितीओबीसी आणि मराठा समाजातील आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांच्या मुद्द्यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचे सांगत, ओबीसी संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

अनधिकृत बांधकामांवर बिल्डरांना इशारा

नागपूरमधील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर शहरातील बिल्डरांना इशारा देताना बावनकुळे म्हणाले की, अंतर्गत नकाशा किंवा डीपी प्लॅनच्या नियमांचे उल्लंघन करून बांधकाम करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात बैठक घेतली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.नागपूरमध्ये पुराचा प्रश्न गंभीर असून, नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात इमारती उभारण्यात आल्या आहेत.

Maharashtra TimesRamraje Nimbalkar : जोपर्यंत राजा टिकून, तोपर्यंत खेळ जिवंत, रामराजेंचा इशारा नेमका कुणाला?सुमारे चार हजार अनधिकृत इमारतींच्या प्रकरणांवरही एकेक करून कार्यवाही सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप रजिस्ट्री झालेली नाही. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.बिल्डरांना त्रास देणे हा शासनाचा उद्देश नसून, विकासकामे अधिकृत करून घेणे आणि नागरिकांच्या मालमत्तेच्या रजिस्ट्रीचा मार्ग मोकळा करणे हा हेतू आहे. दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा