Marathi Live News: जूनच्या पहिल्या पंधरवड्यात दाखल होणाऱ्या मान्सूनने महिनाअखेर जवळ येऊनही पाठ फिरवल्याने चिंतेचे ढग दाटून आले असताना, मंगळवारी मुंबईत मान्सूनचे वारे अधिक सक्रिय झाले. आनंदसरींच्या गारव्यातच मुंबईकरांची सकाळ झाली आणि ते सुखावले. आता मुंबईसह डहाणूपर्यंत मान्सूनरेषा पोहोचली आहे. मुंबईत मान्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने अधिकृतरित्या जाहीर केले. दरम्यान,लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून झालेला केतन विशाल अग्रवाल (वय २५) याचा मृत्यू हा अपघात नसून, पूर्वनियोजित कटातून घडवून आणलेला खून असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे
दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर
