Maharashtra Politics : पक्षाच्या कामकाजात संजय राऊत आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा वाढता हस्तक्षेप, हे उबाठामधील पक्षफुटीचे कारण असल्याचे मानले जाते
एकनाथ शिंदेंचा हा व्हिडिओ कॉलच निर्णायक ठरला. शिंदेंनी या सहा खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारीचे आश्वासन तर दिलेच, पण त्यांच्या भविष्यातील सुरक्षिततेची हमीही दिली. हे सर्व खासदार आज, २० जून रोजी एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ का सोडली, याचे स्पष्टीकरण देणारे निवेदनही जारी करणार आहेत. तसेच शिंदेंचे पुढील लक्ष्य ठाकरे गटातील तीन विधान परिषद आमदार आणि मुंबई महापालिकेतील सर्व ६५ नगरसेवक असल्याचेही सूत्रांकडून समजते.
खासदारांमधील नाराजीचे कारण काय?
१. पक्षाच्या कामकाजात संजय राऊत आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा हस्तक्षेप, हे उबाठामधील पक्षफुटीचे कारण असल्याचे ‘दैनिक भास्कर’च्या वृत्तात म्हटले आहे. बंडखोर खासदारांच्या मते, इतर नेत्यांशी संजय राऊत यांचे वागणे अयोग्य असते; तरीही त्यांच्याविरुद्धची कोणतीही टीका किंवा तक्रार ऐकून घेण्यास उद्धव ठाकरे तयार नसतात.
२. खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बैठका घेण्याची आणि मतदारसंघांना भेटी देण्याची विनंती पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे करुनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
दिल्लीत दाखल झालेले ठाकरे गटाचे सहा बंडखोर खासदार एकनाथ शिंदे यांच्या सतत संपर्कात होते. शिंदेंनी त्यांच्याशी सुमारे ४० मिनिटे चर्चा केली. ‘तुमच्या प्रत्येक निर्णयात मी तुमच्या पाठीशी उभा राहीन’ अशी ग्वाही एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती आहे.
Omraje Nimbalkar : पवनराजे केसमधील सर्व आरोपी निर्दोष, ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर, राजकीय निर्णयाबाबत थेट भाष्य
शिंदेंकडून आश्वासनं
बंडखोर खासदारांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा, आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची हमी आणि त्यांच्या मतदारसंघांतील विकासासाठी पुरेसा निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले. शिंदे यांच्याशी झालेल्या वैयक्तिक चर्चेनंतर, ठाकरे गट सोडण्याचा या खासदारांचा निर्धार अधिकच दृढ झाला.
संजय राऊत पक्षातील सर्वात ताकदवान नेते आहेत, म्हणून उद्धव ठाकरे त्यांच्याविरोधात काही ऐकून घेत नाहीत. संजय राऊत कोणालाही काहीही बोलतात, असंही बंडखोर खासदारांचं म्हणणं आहे. ‘प्रत्येक निर्णयात रश्मी ठाकरेंचा सहभाग असतो. उद्धव यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधी त्यांची परवानगी घ्यावी लागते. रश्मी ठाकरे जरी ‘सामना’च्या संपादक असल्या आणि त्यांच्याकडे पक्षाचे कोणतेही अधिकृत पद नसले, तरी पक्षात त्यांचा दबदबा तितकाच मोठा आहे.’ असं खासदारांनी म्हटल्याचं वृत्त ‘दैनिक भास्कर’ने दिलं आहे.
ऑपरेशन टायगरमध्ये नाव, ओमराजे नॉट रिचेबल; गोवर्धनवाडीतील घराबाहेर पोलीस बंदोबस्त
खासदारांसाठी मंजूर केलेला २ कोटी रुपयांचा निधी थेट त्यांच्या खात्यात जमा केला जात नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी निधीला मंजुरी दिल्याशिवाय खासदार आपल्या मतदारसंघात कोणतेही काम करुन घेऊ शकत नाहीत. जर काही कामच झाले नाही, तर भविष्यात मतं कशी मिळणार? असा सवाल खासदार विचारतात.
विधान परिषद आमदारांवरही डोळा
२०२३ मध्येच उद्धव ठाकरेंच्या पक्षातील तीन विधान परिषद आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे; आता उद्धव ठाकरे यांच्यासह केवळ चारच विधान परिषद आमदार शिल्लक राहिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आणखी तीन आमदारांना आपल्या गटात ओढण्याची योजना आखली गेली आहे. ठाकरेंचे दोन आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून आगामी एक-दोन महिन्यांत नवीन राजकीय समीकरणे उदयास येऊ शकतात.
Revati Sule VIDEO : रेवती सुळेंच्या संगीत सोहळ्यात शाहरुख खानचा धमाकेदार डान्स, नववधूने आनंदाने मिठीच मारली
उद्धवसेनेतील बंडखोरीने फडणवीसांना धक्का?
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १३ जागा जिंकल्या. भाजप आणि शिवसेना (उबाठा) यांनी प्रत्येकी ९ जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने ८ आणि शिवसेना (शिंदे गट) केवळ ७ जागा जिंकू शकली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला एक जागा मिळाली आणि एका अपक्ष उमेदवारानेही विजय मिळवला. परिणामी शिंदे यांची शिवसेना पाचव्या स्थानावर आहे. जर उद्धव ठाकरेंच्या गटातील सहा खासदार शिंदे गटात सामील झाले, तर शिंदे गट आणि काँग्रेसच्या खासदारांची संख्या समसमान १३ इतकी होईल.
