Jayant Patil: सर्वसामान्य नागरिक, घरगुती ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचा दावा पाटील यांनी निवेदन देताना केला.
‘या योजनेच्या अंमलबजावणीनंतर लोकांना मिळालेली प्रचंड वाढीव वीजबिले आणि त्यासोबत आकारण्यात आलेला थकीत दंड यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. शेजारील गोवा राज्यात याच गंभीर समस्येची दखल घेत तेथील मुख्यमंत्र्यांनी जनहितार्थ स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला तात्पुरती स्थगिती दिली आहे, तसेच वाढीव बिलांची आणि अन्यायी दंडाची प्रकरणनिहाय तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत’, असे पाटील यांनी या निवेदनात म्हटले आहे. राज्यातील अनेक भागांत आंदोलने सुरू झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
Uddhav Thackeray : उबाठाचे सात खासदार फुटण्याच्या चर्चा, धोका टाळण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन, सहा दिवसांनी काय घडणार?
‘वीजपुरवठा खंडित केला जाऊ नये’
‘नागरिकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी स्मार्ट मीटर बसविण्याच्या योजनेस त्वरित स्थगिती देण्यात यावी. आत्तापर्यंत आलेल्या सर्व वाढीव बिलांची आणि अतिरिक्त दंडभाराची प्रकरणनिहाय स्वतंत्र पडताळणी करण्यात यावी, ही पडताळणी पूर्ण होईपर्यत ग्राहकांवर झालेली अन्यायकारक दंड आकारणी रद्द करण्यात यावी आणि कोणात्याही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जाऊ नये. तसेच, ग्राहकांना त्यांचा मंजूर वीजभार वाढवून घेण्यासाठी पुरेशी पूर्वसूचना आणि मुदत देण्यात यावी’, अशा मागण्या पाटील यांनी केल्या.
पावसाळी अधिवेशनाचं बिगुल वाजलं! 22 जूनपासून होणार सुरु, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
‘स्मार्ट मीटर’च्या विरोधात एल्गार
वितरणकडून स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार आहे. या सक्तीच्या विरोधात सोमवारी कल्याणमध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी महापौर हर्षाली थविल आणि शहरप्रमुख रवी पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिली. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कारभाराचा निषेध म्हणून अधिकाऱ्यांच्या दिशेने बांगड्या फेकत आपला रोष व्यक्त केला.
