काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल वापरलेल्या शब्दांवरुन महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने केलेल्या टीकेचं समर्थन करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणत निशाणा साधला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : काँग्रेस पक्षाकडून ट्विट करण्यात आलेल्या व्हिडीओत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असे संबोधित करण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने वापरलेले गुंगी गुडिया हे शब्द योग्य असल्याचे म्हटले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण देत असताना सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली. यामुळे राजकारण तापलं आहे. सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यालयात जावून आंदोलन केलं. पण सपकाळ नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
“राजकारण तापण्याचं कारण काय आहे? पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहिजेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले पाहिजे. पत्रकारांनी विचारलेच पाहिजे, पण नागरिक जे विचारत आहेत त्याचे उत्तर दिले पाहिजे. आपल्यावर सार्वजनिक जीवनात आरोप होत असतील त्याचे देखील उत्तर दिले गेले पाहिजे”, असं हर्षवर्धन सपकाळ सुरुवातीला म्हणाले.
“मात्र आपण बघितलं की, ज्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने जे ट्विट केलं, त्यामध्ये पत्रकार प्रश्न विचारत आहेत, आणि एक नेता ज्याच्यावर गुंडगिरीचे आरोप आहेत, लोकप्रतिनिधी ऐवजी गुंड म्हणून ज्याचं व्यक्तीमत्व महाराष्ट्रापुढे आलेलं आहे, अशा प्रवृत्तीची ओळख असणारा व्यक्ती आहे, तो पत्रकारांना चुप बसवत आहे. अशावेळेस बाजूला असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या एक शब्दही बोलत नाहीयत. त्यामुळे मूळ मुद्दा हा त्यांचा वर्तनाचा आहे”, अशी टीका सपकाळ यांनी केली.
काँग्रेसने वापरलेला शब्द शिवी आहे का? सपकाळ यांचा सवाल
“उपमुख्यमंत्रीपदावरची व्यक्ती पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही आणि त्यांच्यासमोर आमदार पत्रकारांना चुप बसवतात हे लोकशाहीला अशोभनीय आहे. अशावेळेस हाताची घडी तोंडावर बोट ठेवणं म्हणचे चुप बसणं अशी भूमिका उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतल्याने काँग्रेसने ट्विटमध्ये गुंगी गुडिया असा शब्दप्रयोग केला आहे”, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
“गुंगी गुडिया शिवी आहे का? अपशब्द आहे का? असंसदीय शब्द आहे का? तर नाही. हे एक वर्णन आहे. जसा तो शब्द आहे तशा स्वरुपात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर अत्यंत व्यवस्थित बसला आहे”, अशी टीका त्यांनी केली.
“सुनेत्रा पवार अनेक विषयांवर बोलत नाहीत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावर सुनेत्रा पवार बोलत नाहीत. या अपघातात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल का होत नाही? त्यावर त्या बोलत नाहीत. अर्थ खातं अद्याप मिळालं नाही. त्यावर त्या बोलत नाहीत. भाजप पक्ष सुनेत्रा पवार यांच्या पक्षावर आणि पक्षातील लोकांवर फार मोठ्या प्रमाणात गदा आणत आहे. तेव्हाही त्या बोलत नाहीत. त्यांनी जो मुकेपणा आणला आहे, हे मुकेपण उपमुख्यमंत्रीपदाच्या नेत्यासाठी अशोभणीय आहे”, अशी खोचक टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
‘शहाणपणा शिकवू नका’
“कुठे अजित पवार यांच्यासारखा खमका नेता, त्यांच्यासोबत काँग्रेसचे मतभेद होते, पण त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगाने कुठली शंका उपस्थित होऊ शकली नाही. अशा बाणेदार आणि परफेक्ट माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करणारी व्यक्ती काही बोलत नाही तर त्यांचं काँग्रेस पक्षाने केलेले वर्णन योग्य अत्यंत योग्य आहे. या टीकेला त्यांनी समजून घ्यावं. त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये”, अशा शब्दांत सपकाळ यांनी निशाणा साधला.
‘दुर्गा आहे असं त्यांनी सिद्ध करावं’
“इंदिया गांधी यांनादेखील एका काळात गुंगी गुडिया म्हटलं गेलं. त्याच इंदिरा गांधी यांनी आपल्या कतृत्वातून त्या टीकेला उत्तर दिलं होतं. थेट अटलबिहारी वाजपेयी सारख्या नेत्यांना त्यांना दुर्गा म्हणावं लागलं. सुनेत्रा पवार यांनी देखील त्या दुर्गा आहेत हे सिद्ध करुन दाखवावं”, असं आव्हान हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं आहे.
“सुनेत्रा पवार यांनी त्या दुर्गा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी तातडीने अर्थखातं स्वत:कडे घ्यावं. अजित पवारांच्या अपघात प्रकरणाचा शोध लावल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हे सांगावं. त्यांनी ताबोडतोब लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय घ्यावा. तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. त्यांनी स्मार्ट मीटर रद्द करावे. त्यांनी असं केलं तर आम्ही त्यांना दुर्गा म्हणू”, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळांकडून निवडणूक आयोगाचा उल्लेख
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोदी-शाह यांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे का, अशी परिस्थिती झाली आहे. आता थेट निवडणूक आयोगाने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहून तुम्ही आणि तुमच्या मुलांकडे अधिकार घेत असताना पक्षाच्या घटनेला अनुसरुन नाही, असं म्हटलं आहे. या प्रश्नाचं उत्तरही सुनेत्रा पवार यांनी दिलं नाही. त्या काहीच बोलत नाहीत त्यामुळे त्यांच्यावर आमच्यापक्षाने गुंगी गुडिया असा केलेला आरोप योग्य आहे”, असा घणाघात हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केल्यानंतर काँग्रेसने देखील जशास तसं उत्तर दिलं जाईल, असं ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा