मुंबईत जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या स्वागतासाठी रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारण्यावरून वाद निर्माण झालाय. घाटकोपर-विद्याविहार परिसरातील सोसायटीमध्ये घडलेल्या या प्रकाराने राजकीय वातावरण तापताना दिसतंय. अशातच मनसेने देखील आक्रमक भूमिका घेत इशारा दिलाय. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.