• Mon. Jun 15th, 2026
    Rajya Sabha Bypoll Election : छगन भुजबळ नाही तर दुसऱ्याच नेत्याला राज्यसभेची उमेदवारी, सुनील तटकरे यांच्याकडून घोषणा

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर अखेर कुणाला संधी द्यायची? याबाबत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतिम निर्णय झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा असताना आता दुसऱ्याच नेत्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कुणाला संधी द्यावी? याबाबत यावेळी चर्चा झाली. खरंतर मंत्री छगन भुजबळ यांचं नाव या जागेसाठी चर्चेत होतं. पण छगन भुजबळ यांनी राज्यसभेत जाण्यासाठी एक अट ठेवल्याची चर्चा होती. आपण राज्यसभेत गेलो तर पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिपद देण्याची मागणी भुजबळांनी केली होती, अशी चर्चा होती. अखेर या विविध चर्चांनंतर आज पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवाराचं नाव निश्चित झालं. कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी भुजबळ नाराज नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

    “उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कुणाला संधी द्यावी? याबाबत आम्ही सर्वांनी साधकबाधक चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांना पक्षाने अधिकृत उमेदवार ठरवला आहे. राजेंद्र जैन यांनी विधान परिषदेत भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेतून 12 वर्षे प्रतिनिधित्व केलं. जिल्हा मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांमध्ये दिर्घकाळ राजेंद्र जैन यांनी काम केलेलं आहे. विदर्भात सुद्धा पक्षाला संधी देण्याचं बरेच दिवस मनात होतं. त्यामुळे त्या दृष्टीकोनातून पक्षाने एकमताने राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

    “आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली. छगन भुजबळ हे पक्षाचे 1999 चे पक्षाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष आहेत. अजित दादांनी निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाचं योगदान जसं आम्हा मंडळींचं होतं तेवढंच योगदान छगन भुजबळ यांचं राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव हा पक्षाला उद्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान होवूनच पुढच्या कालावधीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल करत असताना त्या संदर्भातील निर्णय आम्ही करणार आहोत”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

    भुजबळ नाराज तर नाहीत?

    “छगन भुजबळ आमच्यासोबत बाजूलाच उभे आहेत. भुजबळ असे नेते आहेत, जे त्यांच्या मनात आहे तेच त्यांच्या चेहऱ्यावरही राहतं. ते बोलायला कधी थांबत नाहीत. ते माझ्यासोबत इथे बाजूला उभे आहेत, याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ काम करते”, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.

    उमेदवारी मिळाल्यानंतर राजेंद्र जैन यांची पहिली प्रतिक्रिया

    “माझ्यावर पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जो विश्वास केला आहे, मी विदर्भात चांगल्या पद्धतीत काम करुन, ज्याप्रकारे अजित दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ज्या पद्धतीने प्रमाणिक कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे, त्या पद्धतीने मी काम करणार”, अशी पहिली प्रतिक्रिया राजेंद्र जैन यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा