मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापत चाललाय. मराठा नेते मनोज जरांगे पाटील रखरखत्या उन्हात उपोषण करणार असल्याचा कडक इशारा दिलाय. त्यापूर्वी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेऊन चर्चा करणार आहे. तर जरांगेंसोबतची ही बैठक यशस्वी होणार असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.