• Fri. Jun 5th, 2026
    Ambadas Danve: राज्यात सरकारच्या नावाखाली निव्वळ ‘सर्कस’; इंधन टंचाईवरुन अंबादास दानवेंची टीका

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावाखाली निव्वळ ‘सर्कस’ सुरू असल्याची टीका शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार आणि विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी ‘एक्स’वरून केली.

    ‘कथित साठेबाजी होत असल्याचा सरकारचा दावा असेल, तर एकतरी साठा जप्त झाला आहे का, याचे उत्तर देण्यात यावे. साठेबाजी होत नसेल, तर पुरवठा विभाग झोपला आहे का’, असा प्रश्न दानवे त्यांनी उपस्थित केला.

    Chandrashekhar Bawankule: विधान परिषदेसाठी शिवसेनेला 4 जागा? निवडणूक एकत्रच लढवण्याची बावनकुळे यांची माहिती
    जालना जिल्ह्यात डिझेल विक्रीसंदर्भात काढण्यात आलेल्या आदेशावरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. ‘ट्रॅक्टरची कागदपत्रे आणि नोंदणी क्रमांक दाखवल्याशिवाय कॅनमध्ये डिझेल देऊ नये, असा आदेश प्रशासनाने आहे. मग नांगरणीसाठी भाड्याने ट्रॅक्टर आणणाऱ्या गरीब शेतकऱ्यांनी डिझेल कुठून आणायचे, याचे उत्तर सरकारकडे नाही. जनतेच्या हातातील गाड्या हिरावून घेऊन त्यांच्या हातात हातगाड्या देणे, हाच या सरकारचा मास्टरस्ट्रोक दिसतोय’, असा टोला त्यांनी यावरून लगावला.

    … अन्यथा उद्रेकाला सामोरे जा !
    ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही खोटे बोलले, तरी राज्यातील चित्र इंधनटंचाईची सत्यस्थिती सांगणारे आहे. वाशिम जिल्ह्यात शनिवारी सलग नवव्या दिवशी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. शेतकऱ्यांचे हाल थांबवा आणि तत्काळ इंधनपुरवठा सुरळीत करा. अन्यथा, टंचाईमुळे उद्भवणाऱ्या उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा’, असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी दिला.

    Maharashtra Timesराज्यात जनगणनेला धक्का; खासगी विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम देण्यास मनाई
    ठाकरेंनी फिरविला मंत्रिपदाचा शब्द

    मुंबई: ‘ शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मला एकट्या अपक्षाला मंत्री केले नव्हते, तेव्हा मला ते कॅबिनेट मंत्रिपद देणार होते. पण देताना राज्यमंत्रिपद दिले. शंकरराव गडाख यांना माझ्याऐवजी कॅबिनेट मंत्री केले. ठाकरेंनी कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता. पण, नंतर कॅबिनेट मंत्रिपद शक्य नाही असे सांगितले. मात्र, या मंत्रिपदाच्या अटीवरच त्यांना पाठिंबा दिला होता’, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी केला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed