मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे ला आमरण उपोषण करण्याची घोषणा केली. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत असून चर्चेतून मार्ग काढू प्रसाद लाड यांनी माध्यमांत सांगितलं. त्यामुळं आम्ही सरकार विरोधात नसून तुम्ही जर आमच्या मागण्या मंजूर करत असाल तर आम्ही आंदोलन करणार नाही. तुम्ही 23 तारखेपर्यंत मागण्यांची मंजुरी घेऊन अंतरवालीत यावं असं निमंत्रण जरांगे यांनी प्रसाद लाड यांना दिलंय.