• Wed. Jun 17th, 2026
    Nagpur Crime: भिक्षेच्या जोखडातून 65 जणांची सुटका; चिमुकल्यांचा होत होता वापर, नागपूर हादरलं

    Na​gpur Crime: सुटका केलेल्या ६५ जणांमध्ये १२ बालकांचा समावेश आहे. महिला आणि पुरुष, असे ५३ जण आहेत. सुटका केलेल्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांना तत्काळ संरक्षण व समुपदेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

    नागपूर क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: उन्हाचा पारा ४२ ते ४४च्यावर असतानाही भर उन्हात शहरात चिमुकल्यांना कडेवर घेऊन भिक्षा मागणाऱ्यांवर मंगळवारी मोठी कारवाई करण्यात आली. पोलिस विभाग, महिला व बालविकास विभागाच्या बालसंरक्षण विभागाची चमू आणि सामाजिक कार्यकर्यांच्या संयुक्त विद्यमाने या चिमुकल्यांसह ६५ जणांची भिक्षेच्या जोखडातून सुटका करण्यात आली.

    भर उन्हात बालकांच्या मदतीने भिक्षा मागितली जात असल्याचे चित्र शहराच्या चौकाचौकांत बघावयास मिळत होते. लहान मुलांना गुंगीचे औषध देऊन त्यांचा भिक्षेसाठी वापर होत असल्याचेही वेळोवेळी उघडकीस आले. यात या चिमुकल्यांचा जीव धोक्यात टाकला जातो. काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या या चिमुकल्यांची सुटका व्हावी आणि त्यांना चांगले आरोग्य आणि शिक्षण मिळावे, याबाबतचे वृत्त ‘मटा’ने वेळोवेळी प्रकाशित केले. प्रशासनाकडून कारवाई होत होती; मात्र, पुन्हा तेच चित्र बघावयास मिळत होते. मंगळवारी पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन मुक्ती अंतर्गत हे अभियान राबविण्यात आले.

    Maharashtra TimesNagpur Politics: भाजपला हवी बिनविरोध निवडणूक; राजकीय पक्षांसोबत चर्चा करणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
    कर्मचाऱ्यांना चावा घेण्याचा प्रयत्न
    शहरातील मोक्याच्या ठिकाणी, जिथे भिक्षावृत्तीचे प्रमाण अधिक आहे, अशा भागांमध्ये संयुक्त पथकाने धडक कारवाई केली. कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांचा भिक्षेकऱ्यांनी चावा घेण्याचा प्रयत्न केला. शिव्या दिल्या जात होत्या. मारहाणीचे प्रयत्नही झाले. त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता. मेयो हॉस्पिटल, मोमीनपुरा, गोळीबार चौक, महाल, गांधीबाग, संत्रा मार्केट, सीताबर्डी आणि रेल्वेस्टेशन परिसरात ही कारवाई करण्यात आली. सुटका केलेल्यांना वसतिगृह, बेघर निवारा केंद्र, बालगृह येथे ठेवण्यात आले आहे.

    Maharashtra TimesNagpur News: बारा वर्षांचा संसार, पदरात 2 लेकरं, बायको घर सोडून गेली; कौटुंबिक कलहातून पतीचा टोकाचा निर्णय
    १२ बालकांचा समावेश
    या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली. ही मोहीम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे, पाचपावलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबुराव राऊत आणि तहसील पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्यासह या मोहिमेत चाइल्ड हेल्पलाइनचे प्रतिनिधी अनिकेत भिवगडे, मीनाक्षी धडाडे, पूजा कांबळे, सचिन धोतरकर व रणजीत कुंभारे यांच्यासह सह्याद्री फाउंडेशन, दिव्य वंदना फाउंडेशन, न्यू व्हिजन फाउंडेशन व ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यांचा सहभाग होता.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा