नागपूरच्या केळवद येथे काही टवाळखोरांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत, दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी एका पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील केळवद परिसरात पेट्रोल पंपावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. किरकोळ वादातून सहा युवकांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर जीवघेणा चाकू हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र या घटनेनंतर केळवद पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे काही तासांतच सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. सावनेर–सौंसर महामार्गावरील परसोडी येथील कबीर पेट्रोल पंपावर ही घटना घडली. रवी बांगेडे हे पेट्रोल पंपावर रात्रीची ड्युटी करत होते. त्याचवेळी मोपेडवरून आलेल्या सहा युवकांनी पेट्रोल भरण्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शाब्दिक वाद असलेला हा प्रकार काही क्षणांतच आक्रमक बनला.
वाद वाढत असतानाच एका युवकाने अचानक चाकू काढून रवी बांगेडे यांच्यावर चाकू हल्ला केला. अनपेक्षित हल्ल्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी घाबरले. जखमी अवस्थेत रवी मदतीसाठी ओरडताच परिसरात एकच धावपळ उडाली. हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून मोपेडवरून पसार झाले.
गंभीर जखमी झालेल्या रवी बांगेडे यांना प्रथम सावनेरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता डॉक्टरांनी त्यांना तातडीने नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच केळवद पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. ठाणेदार आशीष सिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि आरोपींच्या हालचालींच्या आधारे शोध मोहीम राबवली.
पोलिसांनी आरोपींना कसं शोधलं?
दरम्यान, आरोपी नागपूरच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सावनेर–पांढुर्णा बायपास मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. काही वेळातच संशयित मोपेड दिसताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. थरारक पाठलागानंतर अखेर पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सोहम खंडारे, भूमेश लांडगे, प्रांजल खंडारे, वंश दोपहरे आणि ऋषी यांचा समावेश आहे. याशिवाय एका अल्पवयीन मुलाचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्व आरोपी नागपूर शहरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी केळवद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी, हल्ल्यामागील खरे कारण आणि आणखी कोणी या कटात सहभागी होते का? याचा तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा