Bacchu Kadu On Farmer Loan Waiver GR: कर्जमाफीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर येणार असून, सरकारने या विषयाकडे उदारतेने पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
कडू मंगळवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल विचारले असता कडू यांनी, विधानसभेत कर्जमाफीची घोषणा झाल्याने सरकारला आता त्यापासून माघार घेता येणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला. थकीत कर्जामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. कर्जमाफी योजनेंतर्गत जाहीर केलेला ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी अपुरा असल्याचे सांगत तो वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. एखाद्या शेतकऱ्याकडे दीड लाख रुपयांचे कर्ज असेल आणि तो एक लाखाची परतफेड करत असेल, तर त्याला अधिक प्रोत्साहन निधी मिळायला हवा, असे ते म्हणाले. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहितीही त्यांनी दिली.
Census In Maharashtra: घरच्यांना घेऊन जा जनगणनेला! प्रशासनातील अधिकाऱ्यांचे उफराटे सल्ले, शिक्षिकांना घरोघरी एकटे फिरण्याची भीती
सर्वांनाच कर्जमाफी देण्याची आवश्यकता नाही; मात्र, ज्यांना खरोखर गरज आहे, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे. दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी. एखाद्याकडे चार लाखांचे कर्ज असल्यास किमान २ लाख रुपये माफ करावेत, असे ते म्हणाले. हमीभावाचा प्रश्न सोडवण्यासाठी पेरणीपासून कापणीपर्यंतची सर्व कामे रोजगार हमी योजनेत समाविष्ट करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, अपंगांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत जिल्हा व तालुका स्तरावर अपंग अधिकाऱ्यांची नियुक्ती तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली.
Nagpur News : मला समाजासाठी काम करायचं आहे! दृष्टिहीन आदित्यची 12वीत 84 टक्क्यांसह गगनभरारी, अधिकारी होण्याचा निर्धार
यावेळी संभाजीनगरमधील अपंग महिलेच्या प्रकरणात काही अधिकाऱ्यांनी अत्यंत अमानुष वागणूक दिल्याचा आरोप करत कडू यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. प्रशासनातील मानवता संपल्याचे हे गंभीर उदाहरण आहे, असे ते म्हणाले. संबंधित महिलेच्या निवासाची तत्काळ योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.
