• Fri. Jun 5th, 2026
    Nashik BJP: बंगालच्या विजयाचा भाजपकडून नाशकात जल्लोष; मंत्री गिरीश महाजनांसह भाजप कार्यकर्त्यांनी धरला ठेका

    Nashik BJP: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमुल काँग्रेसचा पराभव झाला. तेथे इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होत आहे.

    nashik bjp(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमुल काँग्रेसचा मोठा पराभव केल्यानंतर नाशकात भाजपने जोरदार जल्लोष साजरा केला. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘वसंतस्मृती’ कार्यालयासमोर ढोल ताशांच्या गजरात ठेका धरीत आनंदोत्सव साजरा केला.

    भाजपच्या दमदार विजयाबद्दल नाशिक महानगरतर्फे पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी भाजपचे झेंडे हाती घेत ठेका धरला. मंत्री गिरीष महाजन, शहराध्यक्ष सुनील केदार, प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आडके-आहेर, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ नेते विजय साने, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महानगर सरचिटणीस सुनील देसाई आदींसह मंडल अध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

    Maharashtra TimesNashik MHADA Scam: ‘म्हाडा’त बनावट नकाशांद्वारे मंजुरी; नाशिकचा नायब तहसीलदार अटकेत, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
    जिल्ह्यातही आनंदोत्सव
    पश्चिम बंगालसह इतर तीन राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामुळे येवल्यात व मनमाडमध्ये भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी अन् पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला.

    राज्यात अराजक
    भ्रष्टाचार, खून, दरोडे, बलात्कार, तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची दंडेलशाही, सर्वसामान्यांवर अन्याय व अत्याचार यांनी कळस गाठला होता. तेथील अराजकतेमुळे पश्चिम बंगाल भारतात आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. क्रांतीभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले राज्य अराजकतेकडे वाटचाल करीत होते, असे शहराध्यक्ष केदार म्हणाले.

    Maharashtra TimesNashik Crime: क्लासमधील शिक्षिकेचं लाजीरवाणं कृत्य; १० वीतील तरुणीला बेडरुममध्ये पाठवलं, तिथं भाच्याने डाव साधला, घटनेनं संताप
    पश्चिम बंगालमधील हुकूमशाही संपली- महाजन
    पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या दादागिरी आणि हुकूमशाहीला जनता कंटाळली होती. या ठिकाणी भाजपला आता स्पष्ट बहुमत मिळाले आहे. लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे त्यामुळे भाजपसाठी हा आनंदाचा दिवस असून, बंगालमधील हुकूमशाही आता संपुष्टात आल्याचा दावा जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी केला. यापुढे ममता बॅनर्जी यांचे कोणी नावही घेणार नसून, आता बंगालचा विकास झपाट्याने होईल, असेही महाजन म्हणाले. नाशिकमधील सिंहस्थाच्या कामांवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीदेखील लक्ष घालत आहेत. त्यामुळे सिंहस्थाची सर्व कामे आम्ही वेळेत पूर्ण करू, असा दावाही महाजन यांनी केला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा