• Sun. Jun 14th, 2026
    आठ तास ड्युटीचे ‘बारा’ वाजले! आता ’12 तास काम, 24 तास आराम’ संकल्पना आणा, पोलिसांची वाढती मागणी

    Mumbai Police : आठ तासांऐवजी ‘बारा तास ड्युटी आणि २४ तास आराम’ या संकल्पनेला पोलिसांची पसंती आहे. त्यामुळे आठ तासांऐवजी आता १२ तास ड्युटीची अधिकृत घोषणा करण्यात यावी असे पोलिसांचे म्हणणे आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपेश मोरे, मुंबई : मुंबई पोलिसांसह देशभरातील पोलिस दलांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या आठ तास ड्युटीच्या ऐतिहासिक आणि सर्वोत्कृष्ट प्रयोगाला आज, ५ मे रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, या दहा वर्षांच्या कालावधीत आठ तासांचे पुरते बारा वाजले आहेत. करोना काळात २०२० मध्ये कोलमडलेले आठ तासांचे नियोजन अद्यापही सुरळीत झालेले नाही. उलट आता तर आठ तासांऐवजी ‘बारा तास ड्युटी आणि २४ तास आराम’ या संकल्पनेला पोलिसांची पसंती आहे. त्यामुळे आठ तासांऐवजी आता १२ तास ड्युटीची अधिकृत घोषणा करण्यात यावी असे पोलिसांचे म्हणणे असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यावर विचारविनिमय सुरू असल्याचे समजते.

    ड्युटीचे तास निश्चित करावेत

    मुंबईची लोकसंख्या, कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रण करताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण येतो. मुंबई पोलिस दलामध्ये अंमलदारांची संख्या सुमारे ३३ हजार इतकी आहे. यामध्ये महिलांची संख्या पाच हजारांहून अधिक आहे. अनियमित वेळांमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि कुटुंबीयांनादेखील पुरेसा वेळ देता येत नव्हता. यामुळे मुंबई पोलिस दलामध्ये ड्युटीचे तास निश्चित करावेत, अशी मागणी जोर धरू लागली.

    Kirit Somaiya : आझाद मैदान पोलीस स्टेशन बाहेर किरीट सोमय्या यांचा ठिय्या; नेमकं काय घडलं?

    त्यावेळी वाहतूक पोलिस दलात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल रवी पाटील यांनी आठ तास ड्युटी ची संकल्पना मांडली आणि तसा आराखडा तयार केला. तत्कालीन पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी या आराखड्याला मंजुरी देत ५ मे, २०१६ पासून मुंबई पोलिस दलामध्ये आठ तास ड्युटीचा प्रयोग राबविण्यास सुरुवात झाली. देवनार पोलिस ठाण्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व पोलिस ठाण्यांत पोलिसांना आठ तास ड्युटी करण्यात आली.
    Maharashtra TimesPune Nasrapur Case : वीज गेली, सीसीटीव्ही बंद पडले, पण मंदिरासमोरील घरात बॅटरीवरचा CCTV ठरला दुवा; भोरच्या विकृताला 20 वर्षांपूर्वीच झालेली गावबंदी

    करोनाने लावला ब्रेक

    सन २०१६ मध्ये सुरू झालेला आठ तासांचा प्रयोग सुमारे साडेतीन वर्षे सुरळीत चालला. मात्र, मार्च २०२० मध्ये आलेल्या करोनामुळे लागलेल्या लॉकडाउनमध्ये या प्रयोगाला ब्रेक लागला. पोलिस ठाण्यातील अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण पुढे करून आठ तास ड्युटी शिथिल करण्यात आली. तेव्हापासून मुंबई पोलिसांसाठी पूर्वीप्रमाणेच ड्युटीच्या तासांची अद्यापही निश्चिती नाही.
    Maharashtra TimesWatermelon Deaths : ना पाणी, ना कलिंगड-बिर्याणी; अन्नावाटे विष शरीरात गेलं नाही, चौघांच्या शरीरात मॉर्फिन कसं शिरलं? डॉक्टरांचे थक्क करणारे सवाल

    १२ तास काम, २४ तास आराम

    दहा वर्षांत मुंबई पोलिस दलात बरेच बदल झाले असून, अनेक तांत्रिक बदलही झाले आहेत. असे असले तरी मुंबईचे राहणीमान, पोलिसांची जीवनशैली, उपलब्ध मनुष्यबळ आणि प्रवासात जाणारा वेळ पाहता सध्या सर्वांची पसंती १२ तास ड्युटी आणि २४ तास आराम या संकल्पनेला आहे. अनेक पोलिस ठाण्यांतील स्टेशन हाऊस, पीटर ऑपरेटर, पीटर चालक, सीसीटीएनएस स्टाफ, कॉम्बॅट कर्मचारी हे सर्व १२ तास काम करून २४ तास आराम करतात. या वेळापत्रकानुसार काम केल्यास आराम मिळतोच, शिवाय मनुष्यबळही कमी लागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याबाबत आढावा घेण्यास सुरुवात केली असून, नेमकी अंमलबजावणी कशी करावी याबाबत चाचपणी सुरू आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा