पश्चिम बंगालसह पाच राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडत आहे. दरम्यान संजय राऊत यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. बंगालमध्ये ज्या पद्धतीने पॅरा मिलिट्रीने ताबा घेतला, त्यामुळे तिथं कांटे की टक्कर दिसतंय. सुरुवातीचे कल पोस्टलचे आहेत. टेंड्र बदलतील .बंगालमध्ये भाजप यंदा स्पर्धेत आहे. ९० लाख मते डिलिट केली गेली, त्यामुळे हे दिसते. शेवटच्या दोन तीन फेरीत निकाल लागतो असं राऊत म्हणाले. निवडणूक आयोग हा त्यांचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे ते काहीही करू शकतात असंही राऊत म्हणाले