SCLR Final Phase: अंतिम टप्प्यात 1.4 किमी लांबीचा वाकोला ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ला दोन उड्डाणपुलांसह जोडणारा मार्ग पूर्ण होत आहे. या मार्गावर 500 मीटर 4-लेन एलिव्हेटेड कॅरेजवे आणि 900 मीटर 2-लेन कनेक्टरचा समावेश आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (SCLR)च्या अंतिम 1.4 किमी मार्गाचं काम पूर्ण होत आले आहे. लिंक रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील वाकोला आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) दरम्यान थेट कनेकटीव्हीटी निर्माण करणार. एमएमआरडीएने या मार्गावरील शेवटच्या स्ट्रकचरल स्पॅन उभारण्यासोबत हे काम संपवलं आहे. त्यामुळे आता सांताक्रुझ ते चेंबूर 10.88 किमी पूर्व-पश्चिम जोडणारा मार्ग पूर्णपणे कार्यरत होणार आहे.
कधी पूर्ण होणार काम?
हा अंतिम भाग नेटवर्कमधील शेवटचं कनेक्शन पूर्ण करतो. अनेक एलिव्हेटेड मार्ग आणि कनेक्टर्स एकत्र येऊन एक मार्ग तयार होतो. या आठवड्यात, एमएमआरडीएने वाकोला जंक्शन ते भारत डायमंड बोर्स दरम्यानच्या 1.4 किमी विभागातील अंतिम स्ट्रक्चरल कामे पूर्ण केली, ज्यात दोन स्तरांवर दोन उड्डाणपूल आहेत. 1.4 किमी विभागात 500 मीटर लांबीचा 4 पदरी उन्नत कॅरेज वे आणि 900 मीटर लांबीचा दुतर्फा जोडणारा मार्ग आहे. सर्व संरचनात्मक कामे पूर्ण झाल्यामुळे पावसाळ्यापूर्वी या पुलाचं काम पूर्ण करण्याचं एमएमआरडीएचं उद्दिष्ट आहे.Mumbai-Pune Expressway’s Missing Link: प्रवाशांना ‘कनेक्टिंग लिंक’ची भुरळ! घाटातला रस्ता ओस; मुंबई-पुणे प्रवास सुस्साट
वाकोला नाला पुलावर 54 मीटर कंपोझिट गर्डर सुरू करण्यात आले. हे एक आव्हानात्मक काम होते, कारण प्रत्येक तुळकाचे वजन 358 मेट्रिक टन होते आणि पारंपारिक सहाय्यक प्रणाली प्रक्षेपणासाठी उपस्थित नव्हती. प्रत्येक तुळयाची लांबी 54 मीटर, रुंदी 8.5 मीटर आणि खोली 3.13 मीटर होती. हे काम करण्यासाठी 700 मेट्रिक टन आणि 500 मेट्रिक टन क्षमतेच्या दोन क्रेनचा वापर करण्यात आला होता.
35 मिनिटे वाचणार
वाकोला येथे पश्चिम द्रुतगती महामार्गापासून सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड आणि त्यापूढपर्यंत प्रवास या अंतिम मार्गामुळे शक्य होणार आहे. यामुळे प्रवासात 35 मिनिटे वाचणार आहेत. हा आर्म जरी मार्गावरील लहान भाग असला तरी एक महत्त्वाचा भाग आहे. एलिव्हेटेड आर्म्स, ब्रिज आणि कनेक्टर्स एकत्रि करण्यात निर्णायक भूमिका बजावणार आहे. यामुळे एससीएलआर नेटवर्क पूर्ण होणार आहे.
Vadhavan Port: वाढवण बंदराला चालना! पालघर जिल्ह्यातील 124 ग्रामस्थांनी स्वेच्छेने जमीन सोपवली; कसा होणार बंदराचा विकास?
हा अंतिम मार्ग पूर्ण होताच, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गादरम्यान सिग्नल मुक्त कनेकटीव्हीटी निर्माण होणार आहे. मुंबईतील दोन प्रमुख भार बीकेसी सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जोडले जाणार आहेत. सांताक्रूझ, वाकोला, कुर्ला आणि चेंबूर या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा