महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला पराभूत करण्याचं आवाहन भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी केलंय. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असते तर महिला खासदारांची संख्या वाढली असती, मात्र काँग्रेस सह विरोधी पक्षाने तस होऊ दिले नाही. त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेसह सर्वच निवडणुकीत काँग्रेस आणि विरोधकांना पराभूत करणं सर्वांचे काम आहे. ही महिलांची मोठी जबाबदारी आहे, असे अशोक चव्हाण यांनी केले. भाजपाच्या वतीने नारी शक्ती वंदन कार्यक्रमात ते बोलत होते.