Accident News: संबंधित वाहनासह चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, भास्कर राऊत असे त्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मुलीच्या लग्नाला १० दिवस बाकी असताना आईचा दुर्दैवी अंत; भरधाव वाहनाच्या धडकेत जागीच ठार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असताना कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात समोर आली आहे. अवघ्या दहा दिवसांनी मुलीचा विवाह सोहळा पार पडणार असताना भरधाव वेगाने आलेल्या टाटा एस वाहनाने आईला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
ही घटना नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणी दुर्गावती चौकाजवळ, गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव केसर शरणागत (वय ४३) असे असून, त्या आपल्या पतीसोबत बँक ऑफ बडोदा एटीएममधून मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. परत येत असताना हा भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने आलेल्या टाटा एसने प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या टाटा एसला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे वाहनाचा ताबा सुटला आणि त्या वेळी नुकत्याच दुचाकीवरून उतरून पायी चालत जाणाऱ्या केसर शरणागत या महिलेला चिरडले गेले. अपघात इतका भीषण होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे निष्काळजी आणि बेफाम वाहनचालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. अपघाताची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, केसर शरणागत यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरात लग्नाची लगबग सुरू असताना अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे आनंदाचे वातावरण क्षणात दु:खात बदलले. मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणाच्या काही दिवस आधीच आईचा मृत्यू झाल्याने परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा