Maharashtra Heatwave : राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर! उष्मघाताने 15 जणांचा बळी; उन्हाळ्यात कशी काळजी घ्याल?
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या उष्म्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. या उन्हाच्या दिवसांत विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तापमानामध्ये जेव्हा वाढ होते, तेव्हा उष्णतेशी संबंधित आजार आणि उष्माघाताची प्रकरणे वाढीस लागतात. सतत घाम आल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे प्रचंड थकवा येणे, गळून गेल्यासारखे वाटणे, सतत झोप येणे किंवा निद्रानाश, भूक मंदावणे, हातापायाची, डोळ्यांची आग होणे, मळमळ, उलटी यांसारख्या लक्षणांची तीव्रता वाढते. वाढत्या उष्म्यापासून बचाव करण्यासाठी काही बाबींचे पालन करायला हवे, असे डॉक्टरांनी सांगितले.
