Operation Tiger: ठाकरेसेनेचे ९ पैकी ६ खासदार फुटल्याच्या, ते शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये एक ट्विस्ट आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेतील ९ पैकी ६ खासदार फुटल्याचे दावे केले जात आहेत. या सगळ्या घडामोडी सुरू असताना शिवसेना उबाठाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी एका खासदाराशी संपर्क झाल्याचा दावा केला आहे.
ठाकरेंचे सहा खासदार खरंच शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत का, त्यांनी खरंच त्यांचा वेगळा स्थापन केला आहे का, याबद्दल संदिग्धता कायम आहे. सहा खासदारांपैकी दोन खासदारांनी गट स्थापन करण्याच्या पत्रावर सहीच केली नसल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंना आहे. पण सहाच्या सहा खासदार आपल्या सोबत आहेत, याबद्दल ठाकरेसेनेला खात्री नाही. त्यामुळे पेच कायम आहे. Shiv Sena UBT Split: बंडखोरी अन् फोडाफोडी, 17 तारखेचा योगायोग जुळला, नंबर गेम फिरला; मोदींचे ‘ते’ शब्द खरे ठरणार? दुसरीकडे फुटीर खासदारांनी त्यांच्या सह्यांचं पत्र लोकसभेच्या अध्यक्षांना दिलं की नाही, याबद्दलही साशंकता आहे. कारण लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याचा, त्यांना सह्यांचं पत्र दिल्याचा कोणताही फोटो समोर आलेला नाही. त्यामुळे या खासदारांनी ठाकरेंना रामराम केला असल्याच्या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
फुटीर खासदारांच्या यादीत असलेल्या संजय दिना पाटील यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती ठाकरेसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी दिली. ‘खासदार संजय दिना पाटील यांनी खासदार अरविंद सावंत यांना संपर्क केला होता. मी कुठेही जात नाही असं त्यांनी सांगितलं. ते तिकडे जात नाहीत. मग कोण जातंय?’ असा प्रश्न अंधारेंनी उपस्थित केला. Operation Tiger: एक राऊत अन् 7 संजय; ‘सामना’वीर नडत राहिले अन् सेनेत पुन्हा भूकंप; शिंदेंकडून दुसऱ्यांदा दणका ‘संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना फोन लागले नाहीत. पक्षानं लोकसभेच्या सगळ्या खासदारांसाठी व्हिप बजावलेला आहे. त्यांना उद्याच्या बैठकीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. उद्या कोण कोण बैठकीला येतं ते पाहावं लागेल. उद्या सगळे खासदार आले. तर मी त्या सहा खासदारांची जाहीर माफी मागेन. त्यात मला जराही कमीपणा वाटणार नाही,’ असं अंधारे म्हणाले.
लोकसभेत ठाकरेसेनेचे ९ खासदार आहेत. पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत होणाऱ्या कारवाईला बगल द्यायची असल्यास दोन तृतीयांश खासदार पक्षातून बाहेर पडायला हवेत. म्हणजेच किमान ६ खासदारांनी ठाकरेंची साथ सोडायला हवी. ६ खासदार फुटल्याचे दावे सकाळपासून करण्यात आले. त्यांची नावंदेखील समोर आली. पण यातील २ खासदारांनी गट स्थापनेच्या पत्रावर स्वाक्षरीच केली नसल्याचा विश्वास ठाकरेंना आहे. अशा परिस्थितीत ऑपरेशन टायगर अयशस्वी होऊ शकतं.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा