#udaysamant #eknathshinde #shivsena #uddhavthackerayशिवसेना मंत्री उदय सामंत यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. स्वतः विमानात बसून जाणाऱ्या लोकांना पळवून नेले असे म्हणता येत नाही, असे सांगत आज संध्याकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सर्वमान्य असल्याने दररोज पक्षप्रवेश होत आहेत, त्यामुळे कोणत्याही वेगळ्या ऑपरेशनची गरज नसल्याचे सामंत म्हणाले. उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली.