‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून महाराष्ट्रभरात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले असताना, संगमनेरमध्ये एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे सामूहिक वाचन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी विरोधकांचा कडक शब्दांत समाचार घेतला. महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना चांगलंच खडसावलं.