Jayshree Thorat on Sanjay Gaikwad : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून झालेल्या वादातून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची लेक जयश्री थोरात यांनी विरोधकांना धारेवर धरलं आहे.
सामूहिक वाचनाचे आयोजन
गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे वाचन करण्यासाठी संगमनेरमध्ये जनसागर लोटला होता. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, दुर्गा तांबे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवरायांचे नेमके विचार काय होते आणि त्यांचा इतिहास कशा प्रकारे मांडला गेला पाहिजे, हा संदेश देण्यासाठी या सामूहिक वाचनाचे आयोजन करण्यात आले होते.
Devendra Fadnavis: फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महादेव बालगुडे अटकेत, नेमका आरोप काय?
या कार्यक्रमात बोलताना जयश्री थोरात यांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. त्यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने दोन मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांचा जयश्री थोरात यांनी तीव्र निषेध केला. ‘महाराजांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधीही माफ करणार नाही,’ असं म्हणत त्यांनी शास्त्रींच्या विधानाचा समाचार घेतला. तसेच आपली आई आणि विठुरायाला सुद्धा आपण आपला विठुराया असेच म्हणतो असं सांगितलं.
महायुतीच्या नेत्यांवर तोफ डागली
राज्यातील महायुती सरकारमधील नेते वारंवार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘एकीकडे शिवरायांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्याबद्दल चुकीची विधाने करणाऱ्यांना अभय द्यायचे, हा दुटप्पीपणा आता चालणार नाही,’ अशा शब्दांत त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर तोफ डागली. ‘छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे होते. शिवरायांना अजून 10 वर्षे मिळाली असती तर मराठा साम्राज्य जगात राज्य केलं असतं’, असं म्हणत ‘त्यांचा चुकीचा इतिहास पसरवणाऱ्यांना रोखण्यासाठीच आम्ही हे सामूहिक वाचन करत आहोत,’ असं देखील जयश्री थोरात म्हणाल्या.
Ashok Kharat Case: खरात प्रकरणात सर्वांत मोठा पुरावा समोर; आता थेट फार्महाउसमधील स्टिंग ऑपरेशन हाती, ‘कूक’ने काळे कारनामे केले उघड
सत्ताधारी नेते व्यासपीठावर असताना धीरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्यासपीठावरून कुणीही त्यांना रोखलं नाही असे देखील त्यांनी म्हाते आहे.बाळासाहेब थोरात यांच्या कन्या म्हणून जयश्री थोरात आता सक्रिय राजकारणात आणि समाजकारणात आपली पकड घट्ट करताना दिसत आहेत. संगमनेरमधील या मोठ्या शक्तीप्रदर्शनामुळे आणि त्यांच्या आक्रमक भाषणामुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. या सामूहिक वाचनाच्या माध्यमातून काँग्रेसने एकीकडे वैचारिक लढा पुकारला आहे, तर दुसरीकडे महायुतीला शिवरायांच्या मुद्द्यावरून घेरण्याची रणनीती आखल्याचे दिसून येते.
