• Sat. Jun 6th, 2026

    Marathwada Farmer Death Cases: भीषण वास्तव! मराठवाड्यात वर्षभरात सुमारे हजार शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; कोणत्या जिल्ह्यांत सर्वाधिक घटना?

    Marathwada Farmer Death Cases: भीषण वास्तव! मराठवाड्यात वर्षभरात सुमारे हजार शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; कोणत्या जिल्ह्यांत सर्वाधिक घटना?

    Marathwada Farmer Death Cases: मराठवाड्यात वर्षभरात सुमारे हजार शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. कोणत्या जिल्ह्यांत सर्वाधिक घटना?

    मराठवाडा शेतकरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या वर्षभरात तब्बल एक हजार १२९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली, तर गेल्या तीन महिन्यांत विभागात २१७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यात मार्च महिन्यात ८२ घटना घडल्या आहेत.

    मराठवाड्यात सर्वदूर सिंचनाची सोय नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना येथील शेतकऱ्यांना नेहमीच करावा लागतो. पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागणाऱ्या या विभागात गेल्या चार ते पाच वर्षांत मान्सूनमध्ये अतिवृष्टी, सततचा पावसाचादेखील तडखा बसला आहे. गेले वर्षदेखील त्यास अपवाद नव्हते. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. ऐन रब्बी हंगामात अवकाळी पावसासह गारपिटीचे संकटदेखील शेतकऱ्यांवर कोसळले आहे. एकूणच कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान, तर कधी मालाला भाव नाही. परिणामी, बिघडलेली आर्थिक गणिते अशा या चक्रात अन्नदाता सापडला आहे. या व इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar News : डॉक्टर माझ्या गणेशला वाचवा हो! नळाला मोटर लावताना शॉक लागला, छ. संभाजीनगरात अक्षय्य तृतीयेला 11 वर्षीय चिमुरडा दगावला, वडिलांचा सुन्न करणारा आक्रोश
    विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार, जानेवारी महिन्यात ७६, फेब्रुवारीत महिन्यात ५९, मार्च महिन्यात ८२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सर्वाधिक ५३ घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडल्या असून, त्या खालोखाल बीड जिल्ह्यात ४९ दुर्दैवी घटना घडल्या, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, आत्महत्येच्या या २१७ प्रकरणांपैकी ४७ प्रकरणे सरकारी मदतीसाठी पात्र ठरवण्यात आली आहेत. १६१ प्रकरणे चौकशी वा निर्णयसाठी प्रलंबित असून, ४७ प्रकरण अपात्र ठरली आहेत.

    Maharashtra TimesMaharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 जणांना नगरसेवकपदाची लॉटरी, कुणाकुणाला मिळाली संधी?
    शेतकरी आत्महत्यांची जिल्हानिहाय माहिती (एक ते ३१ मार्च २०२६)
    जिल्हा -आत्महत्या

    छत्रपती संभाजीनगर — ५३
    जालना — १३
    परभणी — १९
    हिंगोली — १३
    नांदेड — २९
    बीड — ४९
    लातूर — ११
    धाराशिव — ३०
    एकूण — २१७

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा