Solapur Car Accident: नीरा उजवा कालव्यात कार कोसळून भीषण अपघात. विवाहित मुलीसह आई-वडिलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मुंबईहून फोंडशिरसकडे जाणारी कार शुक्रवारी पहाटे सुमारे चार ते पाचच्या दरम्यान जुन्या पालखी मार्गावरील पुलावरून जात होती. या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट नीरा उजवा कालव्यात कोसळली. अपघात भीषण होता. त्यानंतर कारमधील प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत.
पोलिस सूत्रांकडून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात प्रीती टिळेकर (३०), मंजुळा जठार (५०) आणि हनुमंत जठार (५५) यांचा मृत्यू झाला. मंजुळा आणि हनुमंत जठार हे मोगराळे (ता. माण) येथील रहिवासी असून, ते सध्या मुंबई येथे वास्तव्यास होते. प्रीती टिळेकर (सध्या रा. खारघर, मुंबई) ही त्यांची मुलगी होती. सुनील टिळेकर गाडी चालवत होते. ते सुदैवाने या अपघातातून बचावले. अपघातानंतर ते गंभीर जखमी अवस्थेत बाहेर आले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. कार पाण्यात बुडाल्याने इतर तिघांचा जागीच मृत्यू झाला.
Anjali Damania: रुपाली चाकणकरांचे खरातला 177 कॉल्स; अंजली दमानियांचा दावा, बड्या मंत्र्यांची घेतली नावं!
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
रामनवमीनिमित्त कुटुंबासह फोंडशिरस येथे आलेले टिळेकर कुटुंब परतीच्या प्रवासात होते. मुलाला नातेवाइकांकडे ठेवून त्याला परत घेण्यासाठी निघाले असताना हा अपघात घडला. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Pune Accident : पुण्यात ट्रक-स्कुटीची जोरदार धडक, 28 वर्षांच्या स्नेहल अहिनवे यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस अन् बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. क्रेनच्या साह्याने मोठ्या प्रयत्नांनंतर कार बाहेर काढण्यात आली. या घटनेमुळे मोगराळे गावासह माण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव वेग आणि नियंत्रण सुटणे ही अपघाताची प्राथमिक कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
