Breaking News Live: पश्चिम आशियातील युद्धस्थितीमुळे आधीच संकटात सापडलेले शेतकरी आता गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडले आहेत. नाशिक, खान्देशसह पुणे, सातारा, अहिल्यानगरमध्ये सोमवारी अवकाळी पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला. यात काढणीच्या टप्प्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. दोन दशकांपासून बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या नितीशकुमार यांनी पदाचा राजीनामा दिला. पुढील आठवड्यात ते राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतील, अशी चिन्हे आहेत. नितीश यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदाची सूत्रे नेमकी कोणाकडे सोपविली जाणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
दिवसभरातील ताज्या घडामोडी पाहा फक्त एका क्लिकवर
