Maharashtra Rain Alert: राज्यातील हवामान झपाट्याने बदलत असून अनेक दिवसांपासून पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मुंबईसह परिसरात वाढलेली उष्णता कमी झाली असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील तापमानात घट
मुंबईमध्ये गेल्या आठवड्यात तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहचलं होतं. त्यानंतर शुक्रवारपासून तापमानात घट झाली असून सोमवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असेल. सतत बदलत्या हवामानामुळे तापमानात घट होत आहे.वेस्टर्न डिस्टरबन्समुळे येणाऱ्या लाटांमुळे उत्तर भारतातील हवामानात मोठे बदल झाले आहेत. त्याचा फटका महाराष्ट्रातील काही भागांनाही बसत आहे.
Maharashtra Weather: महाराष्ट्रात पावसाची स्थिती, उष्णतेचा कडाका कमी होण्याची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज
पावसाची शक्यता
सोमवारी मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. दरम्यान, 17 मार्च ते 20 मार्च दरम्यान महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हाचा कडाका कमी होणार असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. परंतु, या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मुंबई, पुण्यात नागरिक उन्हाने हैराण झाले असतानाच, राज्यातील इतर भागांवर पावसाचं संकट आहे. शनिवार आणि रविवारी राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. सोमवारी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, 17-18 मार्चपासून या भागांत पाऊस पडायला सुरुवात होणार असून, 19 ते 20 मार्चपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शनिवारी अकोला जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं. जिल्ह्यात 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी किमान तापमान नोंदवलं गेलं असून 17.6 अंश सेल्सिअश इतकं होतं.
