महाराष्ट्र टाइम्सच्या मायमराठी कलासंगम या महोत्सवाचं उद्घाटन मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते पार पडलं.मराठीसाठी मटाचं भरीव योगदान आहे असं प्रतिपादन आशीष शेलार यांनी यावेळी बोलताना दिलं.कर्मठता, कट्टरता, आग्रह आणि अनुकरणीय विनम्रता ही आपली मराठी माणसाची ताकद आहे असं शेलार म्हणाले.अभिमान संस्कृतीचा, ध्यास प्रगतीचा हे घोषवाक्य माझ्यावरील जबाबदारीशी जुळणारं वाटतं असं शेलारांनी सांगितलं.