‘कामगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार कठोर, निगरगट्ट मनाचे झाले आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला आता दिल्ली दरबारी संसदेत खासदारांद्वारे जागे करावे लागेल. मुंबईसह देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील एनटीसीच्या २३पेक्षा अधिक गिरण्या गेली पाच वर्षे बंद आहेत. कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपासमारीला अंत उरलेला नाही. २९ जुने सक्षम कामगार कायदे रद्द करून, चार कामगार संहिता केंद्र सरकारने लागू केल्या आहेत. त्यामुळे कामगारवर्ग अडचणीत आला आहे,’ असे ते म्हणाले.
‘कामगार संघटनांनी शंभर वर्षांच्या लढ्यातून मिळविलेले कामगार हिताचे २९ कायदे विद्यमान केंद्र सरकारने रद्द करून चार कामगार संहिता लागू केल्या आणि कामगार वर्गाचे भविष्यच अंधारात आणले,’ असा आरोप महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केला.
हे कामगार सहभागी होणार
बँका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, परिचारिका, फेरीवाले, घरेलू कामगार, कंत्राटी कामगार, बस, रिक्षा, टॅक्सी, असंघटित कामगार आदी विविध क्षेत्रांतील कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार आहेत, असे संयुक्त कृती समितीने म्हटले आहे. आंदोलन शांततेत पार पाडण्यात येणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
काय बंद?
सार्वजनिक वाहतूक, बॅंकिंग, विमा सेवा, सरकारी कार्यालय, बाजारपेठा, दुकानं, शाळा-महाविद्यालयं
काय सुरु?
रुग्णालय, औषधांची दुकानं, रुग्णवाहिका आरोग्यसेवा, दूध भाजीपाला पुरवठा, अग्निशमन आपत्कालीन सेवा, वीज पाणीपुरवठा