अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतला.सुनेत्रा पवार ही धुरा समर्थपणे सांभाळतील असा विश्वास तेर येथील माहेरच्या लोकांनी व्यक्त केला.धाराशिव जिल्ह्याचे तेर येथील जावई दिवंगत अजित दादा पवार यांचे अपघाती निधन झालं.अजित पवारांचं दुःख मोठं आहे असंही मत यावेळी व्यक्त करण्यात आलं.वडील, भाऊ राजकारणात असल्यामुळे सुनेत्रा पवारांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे…त्यामुळे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाला न्याय देतील असंही तेरवासिय म्हणाले.