दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा होतेय.या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आपले मत परखडपणे मांडले.सुनील शेळकेंनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाबाबत थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.शरद पवारांच्या पक्षाला विलीनीकरणाची एवढी घाई का आहे, असा सवाल त्यांनी केला.विलीनीकरण होत असल्यास त्यांना भाजपचे नेतृत्व मान्य आहे का? असा प्रश्न शेळकेंनी विचारला.