• Fri. Mar 6th, 2026

    Palghar News: भीषण वास्तव! रस्त्याअभावी 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; झोळी बांधून दवाखान्यात नेताना वाटेतच सोडला जीव

    Palghar News: भीषण वास्तव! रस्त्याअभावी 18 वर्षीय युवकाचा मृत्यू; झोळी बांधून दवाखान्यात नेताना वाटेतच सोडला जीव

    Palghar News: वेळेत उपचार न मिळाल्याने एका १८ वर्षीय युवकाला आपला जीव गमावावा लागल्याची घटना जव्हारमध्ये घडली आहे.

    palghar news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, जव्हार: जव्हार तालुक्यातील तिलोंडा (आंबेपाडा) येथे रस्त्याअभावी युवकाला जीव गमवावा लागला. १८ वर्षीय शैलेश मगन वागदडा हा युवक गंभीर आजारी असताना वेळेवर उपचार न मिळाल्याने मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.

    गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी शैलेशला डोली बांधून दवाखान्याकडे नेले. मात्र, तोपर्यंत उशीर झाल्याने त्याचा प्राण वाचू शकला नाहीत. तिलोंडा (आंबेपाडा) हे आदिवासीबहुल गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. पावसाळ्यात तर या गावाचा संपर्क पूर्णतः तुटतो. रुग्णवाहिका किंवा चारचाकी वाहन गावात पोहोचू शकत नसल्याने आजारी रुग्णांना खडतर डोंगरवाटांवरून डोलीनेच हलवावे लागते. शैलेशच्या बाबतीतही हेच घडले. प्रकृती गंभीर असतानाही वेळेवर दवाखान्यात पोहोचणे शक्य न झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

    Maharashtra TimesBMC Mayor: महापौरांसाठी 35 लाखांची कार! प्रमुख नेत्यांनाही अलिशान गाड्या, BMCकडून कोट्यवधींचा खर्च
    ‘गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता, आरोग्य सुविधा यासाठी मागणी करूनही ग्रामसेवक, सरपंच किंवा संबंधित विभागांकडून कोणताही ठोस पाठपुरावा झाला नाही’, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. प्रशासनाकडून केवळ आश्वासनांचीच खैरात झाली असून प्रत्यक्षात मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या घटनेने तालुक्यातील दुर्गम भागांतील आरोग्य व दळणवळण व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका तरुणाचा बळी गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. रस्त्यासह मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

    Maharashtra TimesMumbai Mayor: मुंबई सोडून जाऊ नका! भाजप, शिवसेना उबाठा पक्षाकडून नगरसेवकांना आदेश
    विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात रस्ते व्हावेत यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निधी उपलब्ध करत रस्ते व्यवस्था बळकट व्हावी म्हणून मागणी केली आहे, असे विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी म्हटले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा