Vijay Wadettiwar: नागपुरात वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता स्थापन करणे आणि तिथला महापौर बसवणे ही आमची प्राथमिकता आहे.
चंद्रपुरात कुणालाही तोडफोड करणे, नगरसेवक पळवणे यासाठी संधी नाही. त्यामुळे कुणी काहीही विधान केले तरी काँग्रेसचाच महापौर होणार आहे. चंद्रपुरात जनतेने काँग्रेसला कौल दिला असल्याने तिथे जनतेला अपेक्षित असा महापौर होणार आहे. शिवसेना (उबाठा)चे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. राज्यात महाविकास आघाडी आल्याने या नगरसेवकांना चंद्रपुरात सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. महापौरपदावर शिवसेना (उबाठा)ने दावा केला आणि हा त्यांचा अधिकार आहे. सर्वच गोष्टींबाबत शिवसेना (उबाठा)तील पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपुरात काँग्रेस निष्ठावंत आणि अनुभवी नगरसेवक यांना महापौर बनवावे, अशी भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
Chandrapur Congress : काँग्रेसमधील मोठी धुसफूस चव्हाट्यावर, अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मध्यस्थी करणार
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ६६पैकी २७ नगरसेवक निवडून आल्याने काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. याशिवाय पप्पू देशमुख यांच्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाशी काँग्रेसची आघाडी होती. शेकापचे तीन नगरसेवक निवडून आल्याने आघाडीची सदस्यसंख्या ३०वर पोहचली आहे. काँग्रेसलाच पाठिंबा देण्याचे निश्चित झाले असल्याची माहिती पक्षाचे प्रमुख पप्पू देशमुख यांनी दिली आहे. दुसरीकडे भाजपचे २३ तर शिवसेनेचा एक असे मिळून २४ संख्याबळ आहे. मनपात सत्ता स्थापनेसाठी ३४ नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे उर्वरित शिवसेना (उबाठा) सहा, वंचित बहुजन आघाडी दोन, अपक्ष दोन तर बसप व एमआयएमच्या प्रत्येकी एक नगरसेवकावर सत्ता स्थापनेची भिस्त राहणार आहे.
Chandrapur Politics: काँग्रेसचे नगरसेवक गुप्तस्थळी; वडेट्टीवार, धानोरकर गट विविध ठिकाणी रवाना, महापौरपदावर भाजपचाही दावा
मुंबई महापौरपदावरून भाजपवर टीका
मुंबई-अहमदाबाद हा राष्ट्रीय मार्ग १९ आणि २० जानेवारी रोजी मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. याची अधिसूचना पालघरच्या जिल्हाधिकारी यांनी गुजराती भाषेत काढली. ही सुरुवात आहे. पालघरपासून गुजरातीचा शिरकाव करण्यात येत आहे. भाजपचा मुंबईत महापौर होणार, म्हणजे कुणाच्या इशाऱ्यावर मुंबई चालणार हे स्पष्ट आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
