• Sun. Mar 8th, 2026
    Maharashtra Weather : वातावरणातील गारवा अचानक वाढला, पुढील 4-5 दिवसांत तापमान आणखी घसरण्याची शक्यता

    Maharashtra Weather Today : राज्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा कमी झाला आहे. हवामानात सतत चढ-उतार होत असून याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचं चित्र आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक : वातावरणातील गारवा वाढल्याचा प्रत्यय सोमवारी (दि. 19) दिवसभर नाशिककरांना आला. गेल्या 24 तासांत किमान तापमान 1.6 अंश सेल्सियसने घसरून 11.4 अंश सेल्सियस नोंदविले गेले. विशेष म्हणजे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरपेक्षाही नाशिक ‘कूल’ ठरले असून, तेथे 13.1 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

    नाशिकमध्ये रविवारी (दि.18) रात्रीपासून अचानक गारवा वाढला आहे. सोमवारी पहाटे गारवा अधिकच जाणवला. दिवसभर गारवा कायम होता. विशेषतः हवेतील गारवा दिवसभर कायम राहिल्याने बोचऱ्या थंडीचा प्रत्यय येत होता. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेच्या प्रभावामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात गारठा वाढल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चार-पाच दिवसांत हे तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे.
    Maharashtra TimesWeather Today : किमान तापमानात सतत चढ-उतार, बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम
    रविवारी सकाळी शहरात 13 अंश सेल्सियस तापमान नोंदविले गेले होते. 24 तासांत ते सुमारे दीड अंश सेल्सियसने कमी झाले. नाशिकमध्येच नाही, तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये अचानक तापमान कमी होऊन गारठा वाढत असल्याचा प्रत्यय येत आहे. येत्या चार-पाच दिवसांत हे तापमान आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

    दरम्यान, मागील काही दिवसांपासून हवामानात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अचानक तापमान कमी – जास्त होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी होत असून सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे.

    शहरातील किमान तापमान

    अहिल्यानगर – 14.6
    छत्रपती संभाजीनगर – 16.4
    जळगाव – 11.8
    मालेगाव – 11.8
    नंदुरबार – 13.5

    धुळ्यात अवकाळी पाऊस, आमदार काशीराम पावरांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली

    मुंबईतही गारवा वाढला

    दरम्यान, मुंबईतही हवेत गारवा वाढला आहे. दुपारी उष्णता जाणवत असली, तरी रात्री आणि पहाटेच्या वेळी गारठा कायम आहे. तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र आता पुन्हा एका तापमानात घट झाल्याचं चित्र आहे. त्याशिवाय हवेत धुकंही आहे. सकाळच्या वेळी मुंबईत दृष्यमानता कमी असून धुकं पसरलं आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा