Kolhapur Accident News : कोल्हापुरात लग्नाच्या अवघ्या दीड महिन्यात नवविवाहितेचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मकर संक्रातीनंतर तरुणीचा मृत्यू झाला.
ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथील नवविवाहित सीमा विकास पाटील (वय 29) यांचा मकर संक्रांतीदरम्यान झालेल्या दुचाकी अपघातात मृत्यू झाला. लग्नाला अवघे 45 दिवस झाले असतानाच बेळगावजवळील या घटनेने पाटील आणि माने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. उत्तर रहदारी पोलिसांकडून या अपघाताचा अधिक तपास सुरु आहे.
Pandharpur News : चिमुकला STचा पास विसरला, पप्पांना फोन करा ते पैसे देतील म्हणत विनवणी; पण कंडक्टरने भर हायवेवर…; संतापजनक प्रकार
दुचाकीवरून जाताना तोल जाऊन पडली
14 जानेवारी रोजी (बुधवारी) संपगाव येथील नातेवाईकांच्या घरी मकर संक्रांती साजरी करण्यासाठी आलेली सीमा ही दुचाकीवरून देवगिरी येथील आणखी एका नातेवाईकाच्या घरी जात होती. अशोकनगरजवळ एका भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीचा तोल जाऊन ती रस्त्यावर पडली. मागे बसलेल्या सीमाला मेंदूसह अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली. प्रथम स्थानिक खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती आणखी गंभीर झाल्याने तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु शनिवार (17 जानेवारी) रात्री उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. उत्तर रहदारी पोलिस स्टेशनमध्ये या अपघाताची नोंद झाली असून, पोलिस संबंधित कार चालकाचा शोध घेत आहेत.
Mumbai Local : मुंबईत तरुणीचं धक्कादायक कृत्य; लोकल ट्रेनचा खोटा एसी पास काढला, पण एका चुकीने बिंग फुटलं; आता घडली चांगलीच अद्दल
थाटात विवाह पार पडला
सीमा आण्णासाहेब माने (वय 29, रा. ऐनापूर) असे नाव असलेल्या या नवविवाहितेचा विवाह 2 डिसेंबर 2025 रोजी विकास जरीगोंडा पाटील (रा. ऐनापूर) यांच्याशी झाला. दोघेही एकमेकांच्या नात्यातील असल्याने काही वर्षांपासून प्रेमात होते. अभियांत्रिकी पदवीधर विकास गडहिंग्लजमध्ये मोबाइल शॉपी चालवतो, तर वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवीधर सीमा स्थानिक फायनान्स सोसायटीत नोकरीला होती. लग्न लांबणीवर पडले असताना सीमाची बहीण स्मिता, भाऊजी सचिन खपले आणि विकासचा भाऊ शिवराज यांनी पुढाकार घेत थाटामाटात विवाह लावून दिला. अपघातवेळी विकास दुचाकी चालवत होता. त्यालाही दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अधुरा राहिला नवं दांपत्याचा सुखी संसार
लग्नापूर्वीच सीमा सासरी प्रत्येक सणावाराला जाऊन सासूला स्वयंपाक आणि घरकामात मदत करत असे. मुख्यमंत्री कौशल्यविकास योजनेतील प्रशिक्षणानंतर ‘रवळनाथ’ संस्थेत तिला कायम नोकरी देखील मिळाली होती. मात्र, संसार फुलण्यापूर्वीच काळाने तिला हिरावून नेले. या घटनेमुळे ऐनापूरसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या पश्चात पती विकास, सासू-सासरे, दीर, आई-वडील, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे. तर पाटील आणि माने कुटुंबीय शोकाकुल अवस्थेत आहेत.
डंपरचा अपघात, कुटुंबाचा आक्रोश… पोलिसांनी सांगितलं पुणे अपघाताचं वास्तव
दरम्यान, या अपघाताने वाहनचालकांना वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. उत्तर रहदारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळी चारचाकीचा भरधाव वेग आणि दुचाकीचा तोल सुटणे, यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांकडून साक्षीदार आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
