• Sun. Mar 8th, 2026
    Nashik Accident News : भल्यापहाटे ट्रॅव्हल्स-पिकअपची समोरासमोर जोरदार धडक; साखरझोपेत चौघांचा जागीच करुण अंत

    Malegaon-Manmad Highway Accident : नाशकातील मालेगाव-मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स आणि पिकअपचा भीषण अपघात झाला असून यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

    नाशिक अपघात चौघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक : मालेगाव–मनमाड महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोनजण गंभीर जखमी असून 20 पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे गावाजवळ आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पुण्याकडून मालेगावच्या दिशेने येणारी एक खासगी ट्रॅव्हल्स आणि समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, पिकअप वाहन थेट ट्रॅव्हल्समध्ये घुसले आणि बसच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आहे.

    भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

    या भीषण अपघातात चार प्रवाशांचा जागीच करुण अंत झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय ट्रॅव्हल्समधील 20हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य राबवण्यात आलं. जखमींना मालेगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे मालेगाव–मनमाड मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
    Maharashtra TimesRupali Thombare: निवडणुकीतील पराभवानंतर ट्रोलिंग; रुपाली पाटलांनी उचललं आक्रमक पाऊल; ट्रोल करणाऱ्यांना आता…

    मृतांची नावं

    मृतांमध्ये मालेगाव येथील शेख अताऊर रहेमान शेख आबिद (वय 39, रा. इस्लामपुरा), सत्तार खान मोहम्मद खान (वय 39, रा. प्लॉट नं. 4, अमनपुरा) आणि याकुब शेरू खान (वय 27, रा. अमनपुरा) यांचा समावेश आहे. ट्रॅव्हल्स बसमधील मृत 26 वर्षीय तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.
    Maharashtra TimesWeather Today : किमान तापमानात सतत चढ-उतार, बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम

    नवा बोगदा हायवेवरून मुंबईला जोडणार

    इंदिरानगर बोगद्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्णत्वास आल्याने या महिनाअखेरपर्यंत तेथील वाहतूक कोंडी टळण्याची शक्यता असताना, आता द्वारकाजवळील ‘ग्रेड-सेपरेटर’च्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मुंबई-आग्रा महामार्गावरील पुढील टप्प्यात उद्भवण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना लवकरच जारी होणार असून, नागरिकांना आणखी काही महिने अडचणींचा सामना करावा लागेल.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा