• Fri. Mar 6th, 2026

    भाजपच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा शिरकाव, एकसंध शिवसेना असताना जिथं भोपळा, तिथं 5 शिलेदारांचा धुरळा

    भाजपच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा शिरकाव, एकसंध शिवसेना असताना जिथं भोपळा, तिथं 5 शिलेदारांचा धुरळा

    Maharashtra Municipal Election – मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. मात्र एका महापालिकेत पहिल्यांदाच ठाकरे गटानं खातं उघडलं आहे. तेथे ठाकरेंचे पाच नगरसेवक विजयी झाले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    शुक्रवारी मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल समोर आला. त्यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांना सर्वाधिक महापालिकेवर सत्ता स्थापन करता येणार आहे. अख्खा देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने यश मिळवलं आहे. पण ठाकरे बंधुंकडून येथे कडवी झुंज देण्यात आली. अन्य महापालिकेत ठाकरे गटाला तितकेसे चांगले यश मिळाले नाही. पण एक महापालिका यास अपवाद ठरली आहे. जिथे पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक निवडून आले आहेत.

    पाच शिलेदार महापालिकेत भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या पनवेल महापालिकेत शिवसेना ठाकरेगटाचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. एकसंध शिवसेना असताना या महापालिकेत एकही नगरसेवक नसण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली होती. मात्र यावेळी शिवसेना ठाकरे गटाने चांगले यश मिळवले आहे. शिवसेनेच्या विजयी उमेदवारांमध्ये लीना गरड, उत्तम मोरबेकर, मेघना घाडगे- भिसे, प्रिया गोवारी, रितीक्षा गोवारी यांचा समावेश आहे.

    पक्षीय बलाबल

    पनवेल महापालिका निडवणुकीतीलनिकालानुसार, भाजप-55, शेकाप-9, शिवसेना ठाकरे गट – 5, काँग्रेस – 4, राष्ट्रवादी अजित पवार – 2, शिवसेना शिंदे गट-2, अपक्ष-1 असे पक्षीय बलाबल आहे. पनवेल महापालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार हे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या महापालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट, आरपीआय यांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. तर शिवसेना ठाकरे गट, शेकाप, काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवली होते. त्यांचे एकूण 18 नगरसेवक निवडून आले आहेत. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयला मात्र येथे सपशेल अपयश आले.

    दिलासा देणारा विजय

    अनेक महापालिकांमध्ये ठाकरे गटाचे प्राबल्य कमी होत आहे. ठाकरेंकडून मुंबईवर सर्वाधिक लक्ष देण्यात आले होते. तर ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे काही प्रमाणात ताकद लावण्यात आली होती. मुंबईत ठाकरेंची कामगिरी समाधानकारक राहिली. परभणी वगळता इतर महापालिकेत मात्र पदरी निराशाच पडली. मात्र पनवेलमध्ये मिळालेला विजय हा पक्षासाठी दिलासा देणारा ठरला आहे.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब,महाराष्ट्र टाइम्स मध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस. साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.… आणखी वाचा