Aaditya Thackeray Pune: आदित्य ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेच्या (ठाकरे) शहर व जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी वेगळा गट करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात शिवसेनेचा खटला जवळपास आता चार-साडेचार वर्षे सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचाही खटला सुरू आहे. मात्र, एखादा पक्ष फुटतो. पक्षाचे नाव चोरले जाते आणि निवडणूक आयोग त्यांना निवडणूक चिन्ह (सिम्बॉल) देते, ही खूप मोठी गोष्ट आहे.
आंदोलन मागे, तरी फडणवीस सरकारला घाम फोडला! कर्जमाफीसाठी रोहित पवार ठाम
जगात मोठी असलेली देशातील लोकशाही या प्रकारामुळे नष्ट होत आहे,’ असे ठाकरे म्हणाले. भाजपचे हे गलिच्छ राजकारण केवळ पक्षांना नव्हे, तर देशाच्या संविधानाला घातक ठरत आहे, असेही ते म्हणाले.
Pune Crime : बँकांनी जप्त केलेल्या डीएसकेंच्या आलिशान कार स्वस्तात देण्याचे आमिष, पुण्यातील एजंटकडून तरुणाची फसवणूक
सर्व खासदार संपर्कात
उद्धव ठाकरे यांनी पक्षाबरोबर असणाऱ्या सर्वांच नेहमीच विश्वास दर्शविला आहे. जे मशाल चिन्हावर जनतेच्या विश्वासाने निवडून आले आहेत, ते सर्व आमच्यासोबत उभे आहेत. कौटुंबिक अडचणींमुळे काही जण बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नसले तरी ते आमच्या संपर्कात होते. शिवसेनेचे सात खासदार संपर्कात असल्याच्या कृपाल तुमाने यांच्या दाव्यावर तुमाने यांनी पुन्हा निवडणूक लढवून जिंकून दाखवावे, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.
उबाठा पक्षाकडून आमदारांची बैठक
येत्या सोमवारी (२२ जून) दुपारी चार वाजता मंत्रालयासमोरील ‘शिवालय’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधिमंडळ पक्षाच्या विधानसभा व विधान परिषदेच्या सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस सर्व सन्माननीय सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे पत्र पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या सहीने काढण्यात आले आहे.
