• Mon. Jun 8th, 2026
    Western Railway : पश्चिम रेल्वेवरील महत्त्वाच्या स्थानकातील पार्सल सेवा बंद; व्यापारी, फळ बागायतदार, छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका

    Parcel Service Shut Down : पश्चिम रेल्वेच्या स्थानकातील पार्सल सेवा बंद करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या बंदमुळे व्यावसायिक, व्यापाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पालघर : पश्चिम रेल्वेने पालघर रेल्वे स्थानकात असलेली रेल्वे पार्सल सेवा तोट्यात असल्याचे सांगत नववर्षाच्या सुरुवातीलाच अचानक बंद केली आहे. त्यामुळे हजारो व्यापारी, छोटे व्यावसायिक, शेतकरी, फळ बागायतदार, आदिवासींचे नुकसान झाले आहे. पालघर रेल्वे स्थानकातील पार्सल घराला कुलूप ठोकून दरवाजावर केवळ ‘डीआरएफ यांच्या आदेशाने’ अशी नोटीस चिकटवण्यात आली आहे.

    स्थानिकांमध्ये संतापाची लाट

    पालघर, बोईसर, डहाणू वाणगाव, सफाळा रेल्वे स्थानकातून सुरू असलेली ही रेल्वे पार्सल सेवा गरीब मच्छिमार, फुलविक्रेते, शेतकरी, फळबागातदार, छोटे व्यापारी यांची जीवनवाहिनी आहे. या रेल्वे पार्सल सेवेद्वारे स्वस्त दरात आणि जलदगतीने देशभरातच नव्हे तर जगभरात माल पोहोचवला जात होता. मात्र एका आदेशात ही सेवा बंद करताना त्याचे परिणाम काय होतील, व्यवसायावर किंवा त्यांच्या दररोजच्या कामाला किती फटका बसेल याचा साधा विचारही रेल्वे प्रशासनाने केला नसल्याचा संताप स्थानिक व्यापारी करत आहेत.
    Maharashtra TimesMaharashtra weather News : राज्यात तापमानाचा पारा घसरला, विदर्भ, मराठवाड्यात थंडी वाढणार; मुंबईत पुढील 48 तास …

    पार्सल सेवेवर मोठी वाहतूक अवलंबून होती, पण सेवा अचानक बंद

    पालघर तालुक्यातील माहीम व केळवे येथील विड्याची पाने, केळीचे पाने, वेगवेगळ्या प्रकारची फुले, भाजीपाला, मासे, चिकू गुजरात राज्यातून येणारा मावा, दुग्धजन्य पदार्थांसारखी कृषी उत्पादने, कोंबडी, बकरीसारखी जनावरे आणि मोटरसायकल यांची वाहतूक या पार्सल सेवेवर अवलंबून होती. आता ही सेवा बंद झाल्याने व्यापाऱ्यांना वसई किंवा वापी येथे जाऊन पार्सल पाठवावे लागणार आहे किंवा पार्सल आल्यास घेण्यासाठी जावे लागणार आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि कष्टात वाढ होणार आहे.

    Kashinath Chaudhary in BJP | पालघर साधू प्रकरणात आरोप आणि भाजपात प्रवेश, नंतर स्थगिती. काय घडलं ?

    अल्प उत्पन्नाचं कारण देत पार्सल सेवा बंद

    अल्प उत्पन्न हे एकमेव कारण रेल्वे प्रशासनाने दिले असले तरी ही सेवा महत्त्वाची होती. गरिबांचा रोजगार, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक बाजारपेठा कायम सुरू ठेवण्याच्या दृष्टीने ही पार्सल सेवा कार्यरत होती, मात्र महसुलाच्या आकड्यामुळे प्रशासनाला याचे सोयरसुतक नसल्याची टीका होत आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा