Sanjay Raut Warns Eknath Shinde: शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महायुतीतील घटक पक्षांना टप्प्याटप्प्याने संपवण्याचा आरोप केला आहे.
धनंजय मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवरही त्यांनी भाष्य केले. ‘वाल्मिक कराड अजूनही तुरुंगात आहे. अजूनही खटला संपलेला नाही. अशावेळी ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप होते, त्यांना मंत्रिमंडळात परत घेण्याचे पाप फडणवीस करतील असे मला वाटत नाही. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेणे फडणवीसांना कठीण जाऊ शकते’, असे ते म्हणाले.
Ajit Pawar: कोकाटेंची गच्छंती, कोणाला संधी? अजितदादा एका दगडात दोन पक्षी मारायच्या तयारीत; मुंडेंना धक्का?
‘फडणवीस मंत्रिमंडळातील एकाच गटाचे दोन मंत्री, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीमुळे गेले. हा या सरकारला लागलेला काळिमा आहे. खरं म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत. त्यांना त्वरित बरखास्त करायला हवे. पैशांच्या बॅगा दिसत आहेत. इतरही अनेक विषय आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्याने ‘गेम’ करतील आणि शेवटचा घाव ते ‘मिंध्यां’ वरच घालतील याची मला पूर्ण खात्री आहे,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
शिंदेंवर पैसे गोळा करण्याचा आरोप
त्याचबरोबर, गुरूवारी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विविध नागरी संस्थांसोबत काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून पैसे गोळा करून त्यांच्या उमेदवारांना निधी पुरवल्याचा आरोप केला आहे. “शिंदे यांनी कंत्राटदारांकडून पैसे घेतले आहेत आणि ही माहिती अचूक आहे. त्यांनी या निवडणुकांसाठी 100 कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे आणि प्रत्येक उमेदवाराला 10 कोटी रुपये देत आहेत,” असा आरोप राऊत यांनी केला.
अमित शाह धनंजय मुंडेंच्या पाठीशी, कोकाटे हीट विकेट, फडणवीस गेम करणार, संजय राऊतांची टीका
राऊत पुढे म्हणाले, “विनोदाची गोष्ट पाहा. प्रत्येक नगरसेवकाने निवडून येण्यासाठी पाच कोटी रुपये दिले आहेत आणि आता शिंदे त्यांच्यापैकी प्रत्येकावर 10 कोटी रुपये खर्च करत आहेत.” महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल विचारले असता, त्यांनी राज्य सरकारवर “शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अपयशी ठरवल्याचा” आरोप केला.
