• Mon. Mar 9th, 2026
    ७ ते ९ मोबाईल-टीव्ही बंद; विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा ठराव, जालन्यातील महिला सरपंच चर्चेत!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    गावातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी जालन्यातील घनसावंगी…तालुक्यातील रवना गावात दररोज दोन तास मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याचा…ठराव घेण्यात आला आहे. महिला सरपंच शिवकन्या देशमुख यांच्या पुढाकाराने…हा उपक्रम राबवला जात आहे. दररोज सायंकाळी ७ वाजता भोंगा वाजल्यानंतर…७ ते ९ या वेळेत गावातील सर्व मोबाईल व टेलिव्हिजन बंद ठेवले जातात आणि विद्यार्थी अभ्यास करतात. या काळात सरपंच लाऊडस्पीकरद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांनी ग्रामसभेत एकमताने हा ठराव घेतला असून…हा उपक्रम गावासह राज्य व देशासाठी दिशादर्शक ठरत आहे.सरपंच देशमुख आणि ग्रामस्थांशी संवाद साधलाय प्रतिनिधी योगेश काकफळे यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed