• Mon. Sep 7th, 2026
’19 डिसेंबरला  मराठी माणूस पंतप्रधान होईल’, Prithviraj Chavan यांच्या वक्तव्यावर विखे पाटील म्हणाले…

पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या पंतप्रधान पदाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. येत्या 19 डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल, असं मोठा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : “माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणजे या संपलेल्या आवृत्ती आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली. त्यावेळी ती घोषणा पृथ्वीराज चव्हाण यांनी मनावर घेऊन महाराष्ट्र काँग्रेसमुक्त केला. जे नेते स्वतःच्या गावातील नगरपालिकेला पॅनल उभे करू शकत नाहीत ते केवळ अस्तित्व दाखवण्यासाठी बोलत आहेत. शिळ्या कढीला ऊत आणायचा हा प्रकार आहे”, अशी टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी 19 डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल असा दावा केला होता. यानंतर विखे पाटील यांनी चव्हाण यांचा चांगला समाचार घेतला आहे. “मलकापूरमध्ये पॅनल उभे करता आले नाही. कराड निवडणुकीतील तुमच्या उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त होतील. पृथ्वीराज चव्हाण यांसारखे नेते म्हणजे आवृत्ती संपलेले आहेत”, अशा शब्दात विखे पाटील यांनी चव्हाण यांच्या प्रश्नाला फटकारले.

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या विजयाचा दावा केला. राजकीय स्थित्यंतरे येत असतात. पण पंढरपूरच्या पांडुरंगाच्याही मनात महायुतीचच सत्ता निवडणुकीनंतर येईल. त्यामुळे पांडुरंग आशीर्वाद देईल, असे आपल्याला पंढरपूरच्या मंदिरात विश्वास वाटतो, असेही यावेळी विखे पाटील म्हणाले. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील ठाकरे बंधूंवर टीका केली.
Maharashtra TimesMunicipal Election Announce : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे बिगूल वाजले, 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल, वाचा A टू Z कार्यक्रम
“मुंबईत मराठी माणसांच्या जीवावर राजकारण केले. पण मुंबईत मराठी माणूस राहिलाच नाही. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी काही उपयोग होणार नाही. ठाकरे ब्रँड संपला आहे. येत्या 15 जानेवारीला मतदार हे भाजप महायुतीच्या पाठीशी उभे राहतील”, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra TimesMunicipal Election : आयुक्तांच्या घरात 150 आणि टॉयलेटमध्ये 10 मतदार कसे? राज्य निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
“राज्यातील निवडणुकात महाविकास आघाडी एकत्रित येऊन निवडणुका लढली. तर थोडीफार काही तरी अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न करेल. पण, मुळात हे विचारासाठी नाही तर सत्तेसाठी एकत्र आलेले लोक आहेत”, अशी टीकाही विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर केली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा