Jalgaon Marathi News : शेतकऱ्याची पोरगी शिक्षणासाठी जिद्दीला पेटली, पण बस रोज हुकायची, नंतर तिने धाडस दाखवलं अन् कमाल झाली. जळगावमधील ही तरूणी असून नेमकं घडलं जाणून घ्या.
जान्हवी महाजन ही शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील असून, ती जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याच्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दररोज तिला शेताच्या बांधावरून बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागत होती. बसस्थानक लांब असल्याने अनेकदा तिची बस चुकवत असे, ज्यामुळे तिच्या शिक्षणात अडथळा येत होता. या समस्येवर मात करण्यासाठी जान्हवीने थेट आमदार प्रताप सरनाईक यांना पत्र लिहून आपल्या व्यथा मांडल्या. तिने शेताजवळ बस थांबवण्याची आणि बससेवा वाढवण्याची कळकळीची मागणी केली होती.
Jalgaon News : कपडे सुकवताना चिमुकल्या भाचीला विजेचा धक्का, वाचवायला गेलेल्या मामाचा अन् ताईचा अंत; जळगाव हळहळलं
आमदार प्रताप सरनाईक यांनी जान्हवीचे पत्र मिळताच त्याची त्वरित दखल घेतली. त्यांनी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) नितीन मैंद यांच्यामार्फत छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव विभाग नियंत्रकांना तातडीने आदेश दिले. एसटी अधिकाऱ्यांनी जान्हवीच्या महाविद्यालयात जाऊन तिच्या प्राचार्यांसमोर तिच्याशी संवाद साधला. तसेच, तिच्या घरी भेट देऊन तिची परिस्थिती जाणून घेतली.
‘एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार’, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
जान्हवीच्या मागणीनुसार, एसटी अधिकाऱ्यांनी लालपरी (बस) थेट तिच्या शेताच्या बांधावर थांबवण्याचा निर्णय घेतला. या एका सकारात्मक पावलामुळे जान्हवीच्या शिक्षणाच्या स्वप्नांना बळ मिळाले आहे. आमदार सरनाईक यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले असून, राज्यातील खेडोपाड्यातील जान्हवीसारख्या गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे निंभोरा गाव सामाजिक जाणिवेचे प्रतीक ठरले आहे.
