Nashik Orphan Girl Wedding : सतरा वर्षांपासून अनाथाप्रमाणे जीवन जगणाऱ्या उज्ज्वलाच्या जीवनात मालेगाव येथील व्यावसायिक हर्षल नागमोती आले
सामाजिक बांधिलकीचा आदर्श
सतरा वर्षांपासून अनाथाप्रमाणे जीवन जगणाऱ्या उज्ज्वलाच्या जीवनाला मालेगाव येथील व्यावसायिक हर्षल नागमोती यांच्या रूपाने उजाळा मिळाला आहे. श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात झालेल्या या विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्चही नागमोती कुटुंबीयांनीच उचलून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.
उज्ज्वला काय म्हणाली?
कन्यादान आणि अन्य सर्व कायदेशीर व भावनिक जबाबदारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने निभावली. या वेळी ‘मटा’शी बोलताना उज्ज्वला म्हणाली, ‘नकळत्या वयात डोक्यावरून पालकांचे छत्र हरपले. अनाथाश्रमात वाढत असताना आपले कुटुंब असावे हे नेहमी वाटायचे. आता मला आई-वडिलांचे प्रेम परत मिळाल्यासारखे वाटत आहे. याचबरोबर अनुरक्षणगृहातील कर्मचारी आणि मैत्रिणींना सोडून जावे लागणार असल्याचे वाईटही वाटत आहे’.
Smriti Mandhana Palash Muchhal Wedding : …अन् शेजारी म्हणाले, आता तुमच्या मुलीशी कोण करतंय लग्न? स्मृतीच्या वडिलांना मारलेले टोमणे, मानधना कुटुंबासोबत काय घडलं वाचा
कन्यादानाची जबाबदारी कोणी घेतली?
पाच वर्षांची असल्यापासून अनाथाश्रमात राहत आलेल्या उज्ज्वलाचा विवाह हर्षल नागमोती यांच्याशी झाल्यावेळी नवीन जीवनाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता, त्याचवेळी बालपणापासून सोबत असलेल्या मैत्रिणींपासून दूर जाण्याची रुखरुखही तिच्या चेहऱ्यावरुन लपत नव्हती. कन्यादान आणि इतर सर्व कायदेशीर आणि भावनिक जबाबदारी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाने निभावल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
Smriti Mandhana Palash Muchhal Wedding : स्मृतीने पलाशला कोरिओग्राफरसोबत रंगेहाथ पकडलं? बॉलिवूड अभिनेत्याचा खळबळजनक दावा, तो फक्त…
नागमोती कुटुंबही आनंदात
दुसरीकडे उज्ज्वलाच्या रूपाने घराला लेक मिळाल्याचा आनंद नागमोती कुटुंबाकडून व्यक्त केला जात आहे. या सोहळ्याप्रसंगी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, विभागीय महिला व बालविकास उपायुक्त चंद्रशेखर पगार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांची उपस्थिती होती.
