• Fri. Jul 24th, 2026
    शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष कुणासोबतही आघाडी करण्यास तयार, फक्त एक पक्ष सोडून!

    ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक पक्ष वगळता इतर सर्व पक्षांसोबत युती करण्यास तयार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या सर्व ठिकाणी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहेत. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकांनंतर लगेच महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवारांचा पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरची राजकीय समीकरण पाहून कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास तयार आहे. केवळ एक पक्षासोबत युती करणार नाही. भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करा, असे आदेश वरिष्ठांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत स्थानिक राजकारण पाहून युती करण्यास पक्षाच्या वरिष्ठांनी परवानगी दिल्याचं वृत्त काही वृत्त वाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. त्यामुळे आगामी काळात नवे राजकीय समीकरणं जुळण्याची चिन्हं दिसत आहेत.
    Maharashtra Times‘हे सरकार चोर; त्यांच्याविरुद्ध हर हर महादेव आरोळी ठोका’, उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये कडाडले
    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची गेल्या आठवड्यात सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक झाली होती. यानंतर दोन दिवसांपासून वाय बी चव्हाण सेंटर येथे पक्षाच्या महिला विभागाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिसा सुळे, फौजिया खान उपस्थित होते. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा महापालिका निवडणुकांमध्ये भाजप सोडून स्थानिक पातळीवर इतर पक्षांसोबत जाणं अनुकूल असेल तर तुम्ही नक्की त्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, असे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना या निवडणुकांमध्ये मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा