Mumbai Children Hostage Scare : २६ ते २९ या तीन दिवसांत शूटिंगच्या वेळी कोणालाही रोहित आर्याचे वागणे संशयास्पद वाटले नाही, असे पालकांनी सांगितले
‘रोहित आर्याने ‘ओटीटी’मध्ये काम करण्यासाठी मुले हवी आहेत, अशी जाहिरात प्रसिद्ध केली होती. शाळांमध्येही ही जाहिरात व्हायरल झाली. शाळांमधून माहिती मिळाल्याने आम्ही विश्वास ठेवला आणि मुलांना ऑडिशनला पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र घडले वेगळेच. असे काही होईल, याचा विचार आम्ही स्वप्नातही केला नव्हता,’ असे पालकांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. या मुलांची सुटका झाल्यानंतर त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालायमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले होते. यामध्ये ११ मुली, पाच मुलगे आणि एका महिलेचा समावेश होता.
महिनाभरापूर्वी ही जाहिरात पाहिल्यावर किंवा शाळेतून मुलांना ओटीटीमध्ये काम करण्यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पालकांनी आपल्या मुलांसाठी अर्ज केला. त्यामध्ये त्यांनी वार्षिक उत्पन्न, मुलांचे छायाचित्र अशी सगळी माहिती पाठवली होती. त्यानंतर एक स्क्रिप्ट पाठवण्यात आले. त्याच्या वाचनाचा व्हिडीओही पालकांनी आर्यला पाठवला. आर्याने २६ तारखेला निवड झालेल्या मुलांना घेऊन मुंबईत येण्याचे पालकांना कळवले. नांदेड येथील शेतकरी दाम्पत्याने आपल्या दोन्ही मुलांना आणले होते. मात्र मोठा मुलगा वयापेक्षा अधिक मोठा दिसतो, असे सांगून त्याला परत पाठवण्यात आले. अन्य मुलांना तेथेच थांबण्यात आले. निवड झाल्यानंतर हा संपूर्ण खर्च देण्यात येईल, असे वचनही आर्याने दिले होते. काही पालक पवई, वर्सोवा, घाटकोपर अशा वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल, नातेवाईक यांच्याकडे थांबले होते.
Leave Request : ब्रेकअपमधून सावरण्यासाठी 12 दिवस सुट्टी हवी, कर्मचाऱ्याचा चक्रावणारा मेल, बॉस म्हणाला, मी तातडीने तुझी…
‘२६ ते २९ या तीन दिवसांत शूटिंगच्या वेळी कोणालाही रोहित आर्य याचे वागणे संशयास्पद वाटले नाही. मात्र तो ज्या टीमसोबत चित्रिकरण करत होता, त्यांच्यासोबत त्याचा विशेष संवाद नव्हता. त्याने यापूर्वी काही लघुपट केले आहेत, तसेच सरकारच्या स्वच्छता अभियानाचा मी भाग आहे, असे सांगितल्याने त्याच्यावर विश्वास ठेवला,’ असे पालकांनी सांगितले. ‘तीन गटांमध्ये मुलांना विभागण्यात आले होते. त्यातल्या दोन गटांतील मुलांना परत पाठवण्यात आले. तिसऱ्या गटातील मुले आज अधिक वेळ शूटिंगसााठी थांबतील, असे त्याने सांगितले आणि त्या स्टुडिओची दारे बंद करून घेतली,’ असा अनुभव पालकांनी सांगितला.
Doctor Attacked : मित्राचा ‘नाईस डीपी’ मेसेज, अंबरनाथमधील प्रसिद्ध महिला डॉक्टरवर पतीचा जीवघेणा हल्ला, थेट खलबत्त्यानेच…
मुलांना दहा मिनिटे भेटून घ्या !
‘मुले अधिक वेळ चित्रिकरणासाठी थांबणार असल्याने तुम्ही मुलांना भेटून घ्या, असा निरोप आर्याने गुरुवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास दिला,’ असे जळगाव येथून आपल्या मुलीला घेऊन आलेल्या शिक्षक पालकाने सांगितले. ‘मुलगी चित्रिकरण करायचे म्हणून उत्साहात होती. तिला फक्त टाटा करून निघालो. इतका वेळ कुठे जाणार म्हणून पवईत फेरफटका मारायचे ठरले होते, पण दुपारी काही पालकांच्या मोबाइलवर आर्यचा व्हिडीओ आला, तेव्हा पायाखालची जमीन सरकली. मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र ती घाबरून गेली. त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या टीमला काहीतरी संशयास्पद असल्याची शंका आल्याने त्यांनी मुलांना धीर दिला असावा,’ असा घटनाक्रमही त्यांनी सांगितला. तो सांगतानाही त्यांना धाप लागत होती.

